शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

रसगुल्ला पश्चिम बंगालचाच, न्यायालयाच्या निर्णयामुळे ओडिशाचं तोंड झालं कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 16:54 IST

पश्चिम बंगालने ओडिशासोबत गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेली 'रसगुल्ला लढाई' जिंकली आहे. दोन्ही राज्यांनी रसगुल्ला आपला असल्याचा दावा करत जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.

ठळक मुद्दे रसगुल्ला मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहेसप्टेंबर 2015 मध्ये ओडिशा सरकारने 'रसगुल्ला दिवस' किंवा 'रसगुल्ला डे' साजरा करण्यास सुरुवात केली होतीपश्चिम बंगालनं रसगुल्लाचं जीआय मानांकन मिळवत ही लढाई जिंकली आहे

नवी दिल्ली - पश्चिम बंगालने ओडिशासोबत गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेली 'रसगुल्ला लढाई' जिंकली आहे. दोन्ही राज्यांनी रसगुल्ला आपला असल्याचा दावा करत जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र रसगुल्ला हा मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे आता अधिकृतपणे रसगुल्ला पश्चिम बंगालचा असल्याचं सिद्ध झालं असून, त्यांनी जीआय मानांकन मिळालं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी राज्यातील लोकांसोबत शेअर केली आहे. 'सर्वांसाठी गोड बातमी आहे. रसगुल्लासाठी बंगलला जीआय मानांकन मिळाल्याने आम्ही खूप आनंदी आणि अभिमानी आहोत', असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. 

सप्टेंबर 2015 मध्ये ओडिशा सरकारने 'रसगुल्ला दिवस' किंवा 'रसगुल्ला डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती. याचवेळी दोन्ही राज्यांमधील हे रसगुल्ला युद्ध सुरु झालं होतं. ओडिशा सरकारने दावा केला होता की, रथ यात्रेदरम्यान देव जगन्नाथ पत्नी देवी लक्ष्मीला घरी एकटे सोडून गेले होते. यामुळे लक्ष्मी देवी प्रचंड चिडल्या होत्या. त्यांनी जगन्नाथ देवाला घरात प्रवेश देण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांचा राग शांत करण्यासाठी जगन्नाथ देवाने रसगुल्ले दिले होते. 

पुरीतल्या जगन्नाथ मंदिरात रसगुल्ला खीरमोहन या नावानं देवासमोर प्रसादासाठी ठेवला जायचा. प्रसादाची ही प्रथा मागील कित्येक दशकांपासून जगन्नाथ मंदिरात राबवली जाते, असं ओडिशा सरकारने सांगितलं.

पश्चिम बंगालने मात्र ओडिशा सरकारचा हा दावा फेटाळून लावला होता. रसगुल्ल्यासाठी प्रक्रिया केलेलं दूध वापरलं जातं, जे पुजेसाठी वापरलं जात नाही किंवा त्याचा प्रसाद देवाला चढवला जात नाही. त्यामुळे जगन्नाथ देवाने लक्ष्मीला रसगुल्ला देण्याचा काही संबंध नाही असं पश्चिम बंगाल सरकारचं म्हणणं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा पश्चिम बंगालमधील लाखो रसगुल्ला उत्पादकांना होणार आहे. 

जीआय मानांकन म्हणजे काय?विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतक-यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते.

भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्‍वासार्हता निर्माण होते.

टॅग्स :Courtन्यायालय