शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal violence: जाळपोळ, दगडफेक... बंगालमध्ये पुन्हा हिंसाचारल! BJP-TMC कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 16:33 IST

West Bengal violence:भाजपच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अश्रूधुर सोडला, कार्यकर्त्यांनी पोलिसाची गाडी जाळली.

West Bengal violence: पश्‍चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधला वाद शिगेला पोहचला आहे. आज भाजपच्या नबन्ना अभियानादरम्यान मोठा गोंधळ झाला. अनेक ठिकाणी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राहुल सिन्हा यांच्यासह अने नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कोलकाता येथील लालबाजार पोलीस मुख्यालयात नेण्यात आले आहे.

पोलिसांची गाडी जाळली

भाजपने मंगळवारी कोलकाता येथील सचिवालयावर मोर्चा काढला(नबन्ना अभिजन मोर्चा). याअंतर्गत राज्यभरातील भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते कोलकाता आणि हावडा येथे पोहोचले. ममता सरकारवरील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून भाजपने हा मोर्चा काढला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारी झाली. काही ठिकाणांहून जाळपोळीचे फोटोही समोर आले आहेत. बडा बाजार पोलिस ठाण्याजवळ पोलिसांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. 

रस्ता अडवल्यामुळे बोटीवरुन गेले

हावडा ते सचिवालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. दुसरीकडे, पूर्व मिदनापूरमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे. तिकडे, तमलूकमध्येही भाजप कार्यकर्त्यांची टीएमसी कार्यकर्त्यांशी हाणामारी झाली. मोर्चात सामील होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन कोलकात्याला जाणाऱ्या बसेस पोलिसांनी उत्तर 24 परगणामध्ये रोखल्या. सचिवालयाकडे जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर कार्यकर्त्यांचा एक गट त्रिवेणी नदीतून बोटीने निघाला. 

एवढे पोलीस आले कुठून-भाजपचा सवालभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले, "मला आश्चर्य वाटते की पश्चिम बंगालमध्ये इतके पोलीस कुठून आले. कोळसा आणि जनावरांची तस्करी होत असताना हे पोलीस कुठे होते. राज्यात अशांतता असते, बॉम्बस्फोट होतात, तेव्हा पोलीस येत नाहीत. एफआयआर नोंदवायला कोणी आले तरी पोलीस उपलब्ध नसतो. मात्र आज भाजपचा मोर्चा रोखण्यासाठी झारखंड आणि बिहारमधून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. बंगालमध्ये एवढ्या पोलीस आहेत तर इथे एवढी गुन्हेगारी का आहे?'' असा सवाल दिलीप घोष यांनी केला. 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका