शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal violence: जाळपोळ, दगडफेक... बंगालमध्ये पुन्हा हिंसाचारल! BJP-TMC कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 16:33 IST

West Bengal violence:भाजपच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अश्रूधुर सोडला, कार्यकर्त्यांनी पोलिसाची गाडी जाळली.

West Bengal violence: पश्‍चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधला वाद शिगेला पोहचला आहे. आज भाजपच्या नबन्ना अभियानादरम्यान मोठा गोंधळ झाला. अनेक ठिकाणी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राहुल सिन्हा यांच्यासह अने नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कोलकाता येथील लालबाजार पोलीस मुख्यालयात नेण्यात आले आहे.

पोलिसांची गाडी जाळली

भाजपने मंगळवारी कोलकाता येथील सचिवालयावर मोर्चा काढला(नबन्ना अभिजन मोर्चा). याअंतर्गत राज्यभरातील भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते कोलकाता आणि हावडा येथे पोहोचले. ममता सरकारवरील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून भाजपने हा मोर्चा काढला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारी झाली. काही ठिकाणांहून जाळपोळीचे फोटोही समोर आले आहेत. बडा बाजार पोलिस ठाण्याजवळ पोलिसांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. 

रस्ता अडवल्यामुळे बोटीवरुन गेले

हावडा ते सचिवालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. दुसरीकडे, पूर्व मिदनापूरमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे. तिकडे, तमलूकमध्येही भाजप कार्यकर्त्यांची टीएमसी कार्यकर्त्यांशी हाणामारी झाली. मोर्चात सामील होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन कोलकात्याला जाणाऱ्या बसेस पोलिसांनी उत्तर 24 परगणामध्ये रोखल्या. सचिवालयाकडे जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर कार्यकर्त्यांचा एक गट त्रिवेणी नदीतून बोटीने निघाला. 

एवढे पोलीस आले कुठून-भाजपचा सवालभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले, "मला आश्चर्य वाटते की पश्चिम बंगालमध्ये इतके पोलीस कुठून आले. कोळसा आणि जनावरांची तस्करी होत असताना हे पोलीस कुठे होते. राज्यात अशांतता असते, बॉम्बस्फोट होतात, तेव्हा पोलीस येत नाहीत. एफआयआर नोंदवायला कोणी आले तरी पोलीस उपलब्ध नसतो. मात्र आज भाजपचा मोर्चा रोखण्यासाठी झारखंड आणि बिहारमधून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. बंगालमध्ये एवढ्या पोलीस आहेत तर इथे एवढी गुन्हेगारी का आहे?'' असा सवाल दिलीप घोष यांनी केला. 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका