शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

West Bengal violence: जाळपोळ, दगडफेक... बंगालमध्ये पुन्हा हिंसाचारल! BJP-TMC कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 16:33 IST

West Bengal violence:भाजपच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अश्रूधुर सोडला, कार्यकर्त्यांनी पोलिसाची गाडी जाळली.

West Bengal violence: पश्‍चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधला वाद शिगेला पोहचला आहे. आज भाजपच्या नबन्ना अभियानादरम्यान मोठा गोंधळ झाला. अनेक ठिकाणी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राहुल सिन्हा यांच्यासह अने नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कोलकाता येथील लालबाजार पोलीस मुख्यालयात नेण्यात आले आहे.

पोलिसांची गाडी जाळली

भाजपने मंगळवारी कोलकाता येथील सचिवालयावर मोर्चा काढला(नबन्ना अभिजन मोर्चा). याअंतर्गत राज्यभरातील भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते कोलकाता आणि हावडा येथे पोहोचले. ममता सरकारवरील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून भाजपने हा मोर्चा काढला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारी झाली. काही ठिकाणांहून जाळपोळीचे फोटोही समोर आले आहेत. बडा बाजार पोलिस ठाण्याजवळ पोलिसांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. 

रस्ता अडवल्यामुळे बोटीवरुन गेले

हावडा ते सचिवालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. दुसरीकडे, पूर्व मिदनापूरमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे. तिकडे, तमलूकमध्येही भाजप कार्यकर्त्यांची टीएमसी कार्यकर्त्यांशी हाणामारी झाली. मोर्चात सामील होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन कोलकात्याला जाणाऱ्या बसेस पोलिसांनी उत्तर 24 परगणामध्ये रोखल्या. सचिवालयाकडे जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर कार्यकर्त्यांचा एक गट त्रिवेणी नदीतून बोटीने निघाला. 

एवढे पोलीस आले कुठून-भाजपचा सवालभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले, "मला आश्चर्य वाटते की पश्चिम बंगालमध्ये इतके पोलीस कुठून आले. कोळसा आणि जनावरांची तस्करी होत असताना हे पोलीस कुठे होते. राज्यात अशांतता असते, बॉम्बस्फोट होतात, तेव्हा पोलीस येत नाहीत. एफआयआर नोंदवायला कोणी आले तरी पोलीस उपलब्ध नसतो. मात्र आज भाजपचा मोर्चा रोखण्यासाठी झारखंड आणि बिहारमधून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. बंगालमध्ये एवढ्या पोलीस आहेत तर इथे एवढी गुन्हेगारी का आहे?'' असा सवाल दिलीप घोष यांनी केला. 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका