शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

गरिबांना घरे देण्याच्या योजनेत पश्चिम बंगाल अव्वल; गुजरात-महाराष्ट्र मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 10:42 IST

बेघरांसाठी पक्की घरे बांधण्याच्या बाबतीत पश्चिम बंगाल हे देशातील आघाडीचे राज्य बनले आहे.

हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : बेघरांसाठी पक्की घरे बांधण्याच्या बाबतीत पश्चिम बंगाल हे देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत सदैव अग्रेसर राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातही याबाबतीत मागे पडले आहे. महाराष्ट्राचीही तशीच गत आहे.

पश्चिम बंगालमध्ये या योजनेंतर्गत सर्वाधिक वेगाने कामे पूर्ण केली जात आहेत. तेथे कामे पूर्ण करण्याचा दर तब्बल ९१.७ टक्के आहे. ३४.६८ लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी ३३.३९ लाख घरे बांधण्यात आल्यामुळे तेथे ९१.७ टक्के लक्ष्य गाठले गेले आहे. 

महाराष्ट्राचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी

महाराष्ट्रात गरिबांसाठी पक्की घरे पूर्ण होण्याचा दर ६९ टक्के आहे, जो राष्ट्रीय सरासरी ७१ पेक्षाही थोडा कमीच आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (पीएमवायजी) अंतर्गत महाराष्ट्रात एकूण १३ लाखांहून अधिक ग्रामीण लाभार्थ्यांना पक्की घरे दिली जाणार आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ ८.९६ लाख (६८.९५ टक्के) घरे पूर्ण झाली आहेत.ग्रामीण बेघर लोकांना पक्की घरे देण्याची राष्ट्रीय सरासरी ७१.१ आहे. या योजनेंतर्गत देशभरातील २.७४ कोटी नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी २.०८ कोटी घरे पूर्ण झाली आहेत.

योगींचा उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी 

भाजपशासित उत्तर प्रदेश या आणखी एका मोठ्या राज्याने ९५ टक्के यश मिळवले आणि पश्चिम बंगालनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या १४ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील २७.२४ लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी २५.८८ लाख घरे पूर्ण झाली आहेत. गुजरातमध्ये या योजनेंतर्गत नोंदणीकृत ४.७२ लाखांपैकी ३.९८ लाख घरे बांधण्यात आली आहेत. पंजाब आणि हरयाणाने अनुक्रमे ६३.६५ टक्के आणि ७६.२२ टक्के लक्ष्य गाठले आहे. ही योजना २०१६मध्ये सुरू करण्यात आली आणि डिसेंबर २०२२पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल