शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

गरिबांना घरे देण्याच्या योजनेत पश्चिम बंगाल अव्वल; गुजरात-महाराष्ट्र मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 10:42 IST

बेघरांसाठी पक्की घरे बांधण्याच्या बाबतीत पश्चिम बंगाल हे देशातील आघाडीचे राज्य बनले आहे.

हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : बेघरांसाठी पक्की घरे बांधण्याच्या बाबतीत पश्चिम बंगाल हे देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत सदैव अग्रेसर राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातही याबाबतीत मागे पडले आहे. महाराष्ट्राचीही तशीच गत आहे.

पश्चिम बंगालमध्ये या योजनेंतर्गत सर्वाधिक वेगाने कामे पूर्ण केली जात आहेत. तेथे कामे पूर्ण करण्याचा दर तब्बल ९१.७ टक्के आहे. ३४.६८ लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी ३३.३९ लाख घरे बांधण्यात आल्यामुळे तेथे ९१.७ टक्के लक्ष्य गाठले गेले आहे. 

महाराष्ट्राचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी

महाराष्ट्रात गरिबांसाठी पक्की घरे पूर्ण होण्याचा दर ६९ टक्के आहे, जो राष्ट्रीय सरासरी ७१ पेक्षाही थोडा कमीच आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (पीएमवायजी) अंतर्गत महाराष्ट्रात एकूण १३ लाखांहून अधिक ग्रामीण लाभार्थ्यांना पक्की घरे दिली जाणार आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ ८.९६ लाख (६८.९५ टक्के) घरे पूर्ण झाली आहेत.ग्रामीण बेघर लोकांना पक्की घरे देण्याची राष्ट्रीय सरासरी ७१.१ आहे. या योजनेंतर्गत देशभरातील २.७४ कोटी नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी २.०८ कोटी घरे पूर्ण झाली आहेत.

योगींचा उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी 

भाजपशासित उत्तर प्रदेश या आणखी एका मोठ्या राज्याने ९५ टक्के यश मिळवले आणि पश्चिम बंगालनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या १४ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील २७.२४ लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी २५.८८ लाख घरे पूर्ण झाली आहेत. गुजरातमध्ये या योजनेंतर्गत नोंदणीकृत ४.७२ लाखांपैकी ३.९८ लाख घरे बांधण्यात आली आहेत. पंजाब आणि हरयाणाने अनुक्रमे ६३.६५ टक्के आणि ७६.२२ टक्के लक्ष्य गाठले आहे. ही योजना २०१६मध्ये सुरू करण्यात आली आणि डिसेंबर २०२२पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल