शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

बंगालची रक्तरंजित निवडणूक! घोषणा झाल्यापासून एका महिन्यात 40 जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 15:20 IST

West Bengal Panchayat Election Violence: पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आणि हिंसाचार एक समीकरण बनले आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आणि हिंसाचार हे समीकरण बनले आहे. निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून राज्यात हिंसाचार सुरू होतो. 2023 सालच्या पंचायत निवडणुकीतही असेच जाले आहे. 5 जून रोजी पंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज जाहीर होताच राज्यात रक्तरंजित खेळ सुरू झाला. निवडणुकीच्या प्रचारापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत हिंसाचार, बॉम्बस्फोट आणि रक्तपात सुरूच होता. गेल्या 30 दिवसांत निवडणूक हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या रात्रीपासूनच हिंसाचार सुरू झाला आणि सकाळी सात वाजल्यापासूनच हिंसाचारासह मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या दिवशीच 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या 40 च्या आसपास पोहोचली आहे. म्हणजेच 30 दिवसांत एकूण 40 जणांचा मृत्यू झाला आहे. निवडणुकीतील हिंसाचारामुळे सोमवारी राज्यातील 697 बूथवर फेरमतदान होत आहे. आजही हिंसाचाराच्या घटना सुरुच आहेत. 

बंगालमध्ये हिंसाचार परंपरा बनली बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीच्या आधी राज्यात डाव्या पक्षांची सत्ता होती. ज्योती बसू आणि बुद्धदेव भट्टाचार्य हे मुख्यमंत्री होते. डाव्या राजवटीतही हिंसाचार सुरू होता. 2003 मध्ये डाव्या राजवटीत झालेल्या हिंसाचारात 70 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 2008 मध्ये निवडणूक हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता.

ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये सत्ता हाती घेतली. 2013 मध्ये पहिल्यांदा पंचायत निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत 39 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. राज्यात दोन वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकीतील हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. निवडणुकीनंतर त्यांच्या 40 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सीबीआय विधानसभा निवडणुकीतील हिंसाचाराचा तपास करत आहे.

सर्वाधिक हत्या मुर्शिदाबादमध्ये झाल्या हिंसाचाराची सुरुवात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातून झाली. मुर्शिदाबादमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबाद जिल्हा मुस्लिमबहुल मानला जातो आणि येथे काँग्रेस नेते अधीर चौधरी यांचा प्रभाव आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक संघर्षाच्या घटना काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस समर्थकांमध्ये घडल्या आहेत. रक्तरंजित संघर्ष केवळ काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्येच झाला आहे, असे नाही. तृणमूल काँग्रेसच्याच पक्षाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचारात भाजप, सीपीआय (एम) आणि आयएसएफच्या कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपा