शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला; 6 जण जखमी, एकाचा मृत्यू, TMC वर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 21:39 IST

west bengal : 'पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपली आहे.'

ठळक मुद्देनुकतेच भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. गुरुवारी जेपी नड्डा डायमंड हार्बरला जात असताना त्यांच्या ताफ्यावर दगडांनी हल्ला करण्यात आला.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यातील संघर्ष पेटला आहे. उत्तर 24 परगना येथील हलिशहरमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा करत हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीररित्या जखमी झाल्याचे भाजपाने म्हटले आहे.

भाजपाने यासंदर्भात ट्विट केले आहे. "आणखी एक दिवस, आणखी एक हत्या. हलिशहरमध्ये कार्यकर्ता सैकत भवाल यांची टीएमसीच्या गुंडांनी निर्घृण हत्या केली, तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना कल्याणीच्या जेएन मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पार्टीचे डोर टू डोर कॅम्पेन करत असताना सैकत भवाल यांच्यावर हल्ला झाला," असे ट्विट करण्यात आले आहे.

दुसरीकडे, ही घटना वैयक्तिक वैर असल्यामुळे घडल्याचे तृणमूल काँग्रेसने  केला आहे. तर भाजपा नेते मुकुल रॉय म्हणाले की, आरएसएस कार्यकर्ता आणि सहा नंबर वॉर्ड हलिशहरमध्ये  राहणारे सैकत भवाल यांची हत्या करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपली आहे.

दरम्यान, बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच कालावधी असताना येथे राजकीय हिंसाचार सुरु झाला आहे. भाजपा आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसांत बर्‍याच वेळा संघर्ष झाला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना ठार मारण्यात येत असल्याचा दोन्ही पक्षांचा आरोप आहे. नुकतेच भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. गुरुवारी जेपी नड्डा डायमंड हार्बरला जात असताना त्यांच्या ताफ्यावर दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनाही दुखापत झाल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल