शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

West bengal panchayat election 2018: हिंसाचारात 20 जण जखमी, CPM कार्यकर्त्याला पत्नीसह जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 14:17 IST

दोन गटात आपापसात झालेल्या वादावादीनंतर हिंसाचार उसळला आहे.

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान दोन गटात आपापसात झालेल्या वादावादीनंतर हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण २६ टक्के मतदान झालं आहे. एकीकडे हिंसाचार सुरु असताना राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून सुरक्षेसाठी ७१,५०० जवानांना तैनात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र परिस्थिती पाहता सरकारचा दावा फोल ठरल्याचं पाहायला मिळतं आहे.

 

रिपोर्टनुसार, दक्षिण २४ परागंज, पश्चिम मिदनापूर आणि कूच बेहार जिल्ह्यांमध्ये काही गट आपापसांत भिडले. तसंच मतदान केंद्र ताब्यात घेतल्याची घटना घडली. स्थानिकांनी आपण मतदानासाठी गेलो असता टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे. त्यांना एमजेएन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

२४ परगना परिरात रविवारी रात्री सीपीएमच्या एक कार्यकर्ता आणि त्याची पत्नी घरी झोपेत असताना आग लावून जिवंत जाळण्यात आलं. यामागे टीएमसीचा हात असल्याचा सीपीएमचा आरोप आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये आक्रोश आहे. हिंसाचार सुरु असल्याने अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बिलकंडा येथे एका भाजपा कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. चाकूने हा हल्ला करण्यात आला असून, यामागे टीएमसी कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला जातो आहे. 

 

पश्चिम बंगाल राज्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणूक होते आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालं. सकाळपासूनच लोकांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिला.