शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

West Bengal Election 2021 : बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला, तर मुर्शिदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?; ओवेसींचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 19:09 IST

बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

ठळक मुद्देबांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी७० वर्षात झालं नाही ते ५ वर्षात करून दाखवू, ओवेसींचं आश्वासन

"बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटलं होतं. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असंही ते म्हणाले होते. आता यावरून एमआयएचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. जर बांगलादेशसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता, मुर्शिदाबादच्या लोकांना ते बांगालादेशी का म्हणतात," असा सवाल ओवेसी यांनी केला. शनिवारी मुर्शिदाबाद येथे आयोजित एका रॅलीला ते संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.  "भाजपनं देशात अशाप्रकारे घृणा पसरवली आहे जसं मुस्लीमाचा मुलगा मंदिरात पाणी घेण्यासाठी जातो तेव्हा त्याच्यासोबत गैरवर्तन केलं जातं. मुस्लीमांना जिहादी, आदिवासींना नक्षली आणि सेक्युलर थिंकर्सना राष्ट्रविरोधी असं संबोधलं जातं," असंही ते म्हणाले. "पश्चिम बंगालमध्ये डावेपक्ष आणि काँग्रेसकडून काही होणार नाही. बंगालमीधल मुस्लीम जनता डाव्या पक्षांमुळे चिंतीत आहे. त्यांनी काहीही केलं नाही. तुम्हाला हत्यारं उचलण्याची गरज नाही. केवळ भारताच्या संविधानाला समजून घेत मतदान करण्याची गरज आहे," असंही ओवेसी यांनी नमूद केलं.पाच वर्षांत करून दाखवू"ममता बॅनर्जींना विचारा त्यांची राम मंदिराबाबत काय भूमिका आहे. तृणमूल काँग्रेसनं तीन तलाखच्या वेळी वॉकाआऊट केलं पण मतदान का केलं नाही. तुम्ही सर्वांना मतदान केलंय. एकदा आम्हाला मतदान करून पाहा. जे ७० वर्षांमध्ये झालं नाही ते पाच वर्षांमध्ये करून दाखवू," असं आश्वासनही ओवेसी यांनी दिलं. डाव्या पक्षांनी मुस्लीमांच खच्चीकरण केलं. इंन्कलाब येणार येणार म्हणत बंगालच्या मुलांचा नाश केला. तुमची मुलं तुरूंगात पडून राहतील आणि त्यांचं आयुष्य तिकडेच खराब होईल," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश