शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election 2021 : बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला, तर मुर्शिदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?; ओवेसींचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 19:09 IST

बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

ठळक मुद्देबांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी७० वर्षात झालं नाही ते ५ वर्षात करून दाखवू, ओवेसींचं आश्वासन

"बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटलं होतं. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असंही ते म्हणाले होते. आता यावरून एमआयएचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. जर बांगलादेशसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता, मुर्शिदाबादच्या लोकांना ते बांगालादेशी का म्हणतात," असा सवाल ओवेसी यांनी केला. शनिवारी मुर्शिदाबाद येथे आयोजित एका रॅलीला ते संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.  "भाजपनं देशात अशाप्रकारे घृणा पसरवली आहे जसं मुस्लीमाचा मुलगा मंदिरात पाणी घेण्यासाठी जातो तेव्हा त्याच्यासोबत गैरवर्तन केलं जातं. मुस्लीमांना जिहादी, आदिवासींना नक्षली आणि सेक्युलर थिंकर्सना राष्ट्रविरोधी असं संबोधलं जातं," असंही ते म्हणाले. "पश्चिम बंगालमध्ये डावेपक्ष आणि काँग्रेसकडून काही होणार नाही. बंगालमीधल मुस्लीम जनता डाव्या पक्षांमुळे चिंतीत आहे. त्यांनी काहीही केलं नाही. तुम्हाला हत्यारं उचलण्याची गरज नाही. केवळ भारताच्या संविधानाला समजून घेत मतदान करण्याची गरज आहे," असंही ओवेसी यांनी नमूद केलं.पाच वर्षांत करून दाखवू"ममता बॅनर्जींना विचारा त्यांची राम मंदिराबाबत काय भूमिका आहे. तृणमूल काँग्रेसनं तीन तलाखच्या वेळी वॉकाआऊट केलं पण मतदान का केलं नाही. तुम्ही सर्वांना मतदान केलंय. एकदा आम्हाला मतदान करून पाहा. जे ७० वर्षांमध्ये झालं नाही ते पाच वर्षांमध्ये करून दाखवू," असं आश्वासनही ओवेसी यांनी दिलं. डाव्या पक्षांनी मुस्लीमांच खच्चीकरण केलं. इंन्कलाब येणार येणार म्हणत बंगालच्या मुलांचा नाश केला. तुमची मुलं तुरूंगात पडून राहतील आणि त्यांचं आयुष्य तिकडेच खराब होईल," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश