शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

"भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणूनच पक्ष सोडला", बाबुल सुप्रियो यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 12:02 IST

Babul Supriyo : भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणून पक्ष सोडला, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियो यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणून पक्ष सोडला, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.  

बाबुल सुप्रियो यांनी पक्ष बदलल्याबद्दल सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. शुक्रवारी (18 मार्च 2022) त्यांनी ट्विट केले की, "मी द्वेष आणि फुटीरतावादी राजकारणामुळे पक्ष (भाजप) सोडण्याचा निर्णय घेतला. मी अशा प्रकारच्या राजकारणाशी अधिक संलग्न होऊ शकत नाही." 

याचबरोबर, बाबुल सुप्रियो यांच्या मते, "आसनसोलच्या लोकांना माहित आहे की मी बंगालमध्ये 70:30 किंवा 80:20 सारखे सांप्रदायिक आणि संकुचित विचारसरणीचे राजकारण कधीच केले नाही आणि करणार नाही."

दरम्यान, बाबुल सुप्रियो हे पश्चिम बंगालमधील बालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. बाबुल सुप्रियो यांना केंद्रात मंत्रीपदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी भाजप सोडला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजप सोडला आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात अग्निमित्र यांना उमेदवारी दिलीदरम्यान, पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने आमदार अग्निमित्रा पाल यांना तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात उभे केले आहे. त्याचवेळी, कोलकाताच्या बालीगंज विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपने पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या केया घोष यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी तृणमूल काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

टॅग्स :Babul Supriyoबाबुल सुप्रियोtmcठाणे महापालिका