शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ममतांची व्हीलचेअरवरून रॅली; म्हणाल्या, 'लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:58 IST

West Bengal Assembly Elections 2021: भाजपा खोटे बोलून जिंकली आहे, ते सर्व काही विकत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला.

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारपासून व्हीलचेअरवरून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारपासून व्हीलचेअरवरून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात नंदीग्राममध्ये प्रचार सभेदरम्यान ममता बॅनर्जी या धक्का लागल्यामुळे जखमी झाल्या आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज पुरुलियामध्ये जवळपास ३०० किलोमीटरची रॅली काढली. यावेळी त्यांनी स्वत: जखमी असल्याचा उल्लेख करत भाजपावर निशाणा साधला आहे. (West Bengal Assembly Elections 2021: Mamata Banerjee addressed a rally in Purulia targets BJP)

"लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त आहेत. मी अपघातात जखमी झाले. मी वाचले हे माझे नशीब आहे. मला प्लॅस्टर लावण्यात आले असून मी चालू शकत नाही. काही लोकांचा असा विचार होता की, मी तुटलेल्या पायाने बाहेर पडू शकणार नाही," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. याचबरोबर, याठिकाणी भाजपा खोटे बोलून जिंकली आहे, ते सर्व काही विकत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने याठिकाणी विजय मिळविला होता.

"आम्ही विकास करण्यासाठी गुंतलो आहोत आणि भाजपा इंधन आणि स्वयंपाक गॅसच्या किंमती वाढवत आहे, रॉकेलही नाही," असे सांगत ममता बॅनर्जी यांनी इंधनाच्या वाढत्या किंमतीवरून केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. तसेच, त्या म्हणाल्या,"आमच्या सरकारने विधवांसाठी एक हजार रुपये पेन्शन जाहीर केली आहे. आमच्या सरकारने 'दुआरे'च्या (दारात) अंतर्गत शासकीय जात प्रमाणपत्रे वाटली आहेत. आम्ही रघुनाथ मुर्मू परिसरही बांधला आहे.''

दरम्यान, गेल्या बुधवारी नंदीग्राम येथून निवडणूक फॉर्म भरल्यानंतर ममता बॅनर्जी येथील बाजारातील लोकांना अभिवादन करण्यासाठी गाडीच्या फूटबोर्डवर उभ्या होत्या. त्यावेळी धक्का लागल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर ममता बॅनर्जी आणि त्यांची पार्टी तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला. 

भाजपाकडून हल्लाच करण्यात आल्याचे तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आणि चौकशी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, हा हल्ला नसून अपघात आहे. गेल्या शुक्रवारी अहवाल मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

(ममतांवर कुठलाही हल्ला नाही, निवडणूक आयोगाचा निर्वाळा)

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाPoliticsराजकारणwest bengalपश्चिम बंगाल