शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ममतांची व्हीलचेअरवरून रॅली; म्हणाल्या, 'लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:58 IST

West Bengal Assembly Elections 2021: भाजपा खोटे बोलून जिंकली आहे, ते सर्व काही विकत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला.

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारपासून व्हीलचेअरवरून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारपासून व्हीलचेअरवरून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात नंदीग्राममध्ये प्रचार सभेदरम्यान ममता बॅनर्जी या धक्का लागल्यामुळे जखमी झाल्या आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज पुरुलियामध्ये जवळपास ३०० किलोमीटरची रॅली काढली. यावेळी त्यांनी स्वत: जखमी असल्याचा उल्लेख करत भाजपावर निशाणा साधला आहे. (West Bengal Assembly Elections 2021: Mamata Banerjee addressed a rally in Purulia targets BJP)

"लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त आहेत. मी अपघातात जखमी झाले. मी वाचले हे माझे नशीब आहे. मला प्लॅस्टर लावण्यात आले असून मी चालू शकत नाही. काही लोकांचा असा विचार होता की, मी तुटलेल्या पायाने बाहेर पडू शकणार नाही," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. याचबरोबर, याठिकाणी भाजपा खोटे बोलून जिंकली आहे, ते सर्व काही विकत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने याठिकाणी विजय मिळविला होता.

"आम्ही विकास करण्यासाठी गुंतलो आहोत आणि भाजपा इंधन आणि स्वयंपाक गॅसच्या किंमती वाढवत आहे, रॉकेलही नाही," असे सांगत ममता बॅनर्जी यांनी इंधनाच्या वाढत्या किंमतीवरून केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. तसेच, त्या म्हणाल्या,"आमच्या सरकारने विधवांसाठी एक हजार रुपये पेन्शन जाहीर केली आहे. आमच्या सरकारने 'दुआरे'च्या (दारात) अंतर्गत शासकीय जात प्रमाणपत्रे वाटली आहेत. आम्ही रघुनाथ मुर्मू परिसरही बांधला आहे.''

दरम्यान, गेल्या बुधवारी नंदीग्राम येथून निवडणूक फॉर्म भरल्यानंतर ममता बॅनर्जी येथील बाजारातील लोकांना अभिवादन करण्यासाठी गाडीच्या फूटबोर्डवर उभ्या होत्या. त्यावेळी धक्का लागल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर ममता बॅनर्जी आणि त्यांची पार्टी तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला. 

भाजपाकडून हल्लाच करण्यात आल्याचे तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आणि चौकशी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, हा हल्ला नसून अपघात आहे. गेल्या शुक्रवारी अहवाल मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

(ममतांवर कुठलाही हल्ला नाही, निवडणूक आयोगाचा निर्वाळा)

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाPoliticsराजकारणwest bengalपश्चिम बंगाल