शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

ममतांच्या आशेवर पाणी, नंदीग्राममध्ये शुभेंदूच राहणार विजयाचे 'अधिकारी'; आरओंची सुरक्षा वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 6:54 PM

ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. मात्र तो निवडणूक आयोगाने फेटाळला. आयोगाने म्हटले आहे...

नंदीग्राम - पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आपले पूर्वीचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीतील पराभवानंतर, पुन्हा मतमोजणी करण्याची त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की रिटर्निंग ऑफिसरचा निर्णय अंतिम आहे आणि या निर्णयाला केवळ उच्च न्यायालयातच आव्हान दिले जाऊ शकते. यानंतर आता नंदीग्राममध्ये आरओ राहिलेल्या अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (West Bengal Assembly Elections 2021 big blow for mamata banerjee eci says no recounting in nandigram)

नंदीग्राममध्ये दुसऱ्यांदा मतमोजणी होणार, यासंदर्भात माध्यमांत आलेले वृत्त निवडणूक आयोगाने फेटाळले आहे. आयोगाने म्हटले आहे, की एखाद्या विधानसभा मतदारसंघात रिटर्निंग अधिकारी (आरओ) आरपी अॅक्ट, 1951 अंतर्गत अर्ध-न्यायिक क्षमतेने स्वतंत्रपणे आणि निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणेच आपले काम करत असतात.

खुद्द 'ट्विटर'नंच सांगितलं; ...म्हणून सस्पेंड करण्यात आलं कंगना रणैतचं अकाउंट!

निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की नियमाप्रमाणे, जर दुसऱ्यांदा मतमोजणीची मागणी करण्यात आली, तर रिटर्निंग अधिकाऱ्याला ती स्वीकारण्याचा अथवा असंगत वाटल्यास नाकारण्याचाही अधिकार आहे. आरओंच्या निर्णयाला आरपी अॅक्ट 1951 च्या कलम 80 अंतर्गत निवडणूक याचिकेच्या सहाय्यानेच आव्हान दिले जाऊ शकते.

निवडणूक आयोगाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ''नंदीग्राममध्ये मोजणी संपल्यानंतर एका उमेदवाराच्या इलेक्शन एजन्टने दुसऱ्यांदा मतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, आरओंनी आपल्या समोरील तथ्यांच्या आधारी ती तोंडी आदेशाने फेटाळली. यानंतर निकालाची घोषणा करण्यात आली. यानंतर केवळ उच्च न्यायालयात जाण्याचाच मार्ग शिल्लक राहतो. 

'मतमोजणी प्रक्रियेत गडबड नाही' -यासंदर्भात, ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. मात्र तो निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. आयोगाने म्हटले आहे, की सर्वच काउंटींग टेबलवर एक मायक्रो ऑब्झर्वर होते आणि त्यांनी आपल्यारिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारची गडबड झाल्याचा संकेत दिला नाही. सर्व राउंड्सनंतर आरओंनी सर्व उमेदवारांनी मिळालेल्या मतांची एंट्री केली होती. तसेच ती डिस्प्ले बोर्डावरही दर्शविली होती. हे काउंटिंग एजन्ट्स सहजपणे बघू शकत होते. संपूर्ण मोजमी प्रक्रियेदरम्यान कुणीही यावर शंका व्यक्त केली नाही. तसेच प्रत्येक राउंडनंतर सर्व एजन्ट्सना रिझल्टची कॉपी देण्यात येत होती.

West Bengal Election 2021: “असा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होते”; जेपी नड्डा कडाडले

आरओंना देण्यात आली सुरक्षा - निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की नंदीग्रामच्या आरओंवरील दबावासंदर्भात माध्यामंत आलेल्या वृत्तानंतर पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना 3 मेरोजी आदेश देण्यात आला आहे, की आरओंना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी. राज्य सरकारने त्यांना सुरक्षा दिली आहे. तसेच आयोगाने पश्चिम बंगालच्या सीईओंना सर्व निवडणूक रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यात यावे, असेही सांगितले आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMamata Banerjeeममता बॅनर्जी