शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदान वेळेनुसारच; एकाच टप्प्यात घेण्याची मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:47 IST

West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माेठ्या प्रचार सभा आणि दिग्गज नेत्यांचे राेड शाे झाले. आता राज्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार हाेतांना दिसत आहे.

काेलकाता : काेराेनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेउन पश्चिम बंगालमध्ये एकाच टप्प्यात उर्वरित मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयाेगाने फेटाळली आहे. यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आयाेगाने सर्वांची भूमिका जाणून घेतल्यानंतर निर्णय घेतला. तसेच सायंकाळी ७ वाजेनंतर काेणत्याही प्रकारे प्रचारास बंदी घातली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माेठ्या प्रचार सभा आणि दिग्गज नेत्यांचे राेड शाे झाले. आता राज्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार हाेतांना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये १ ते १४ एप्रिल या कालावधीत तब्बल ४२० टक्क्यांनी काेराेनाची रुग्णसंख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काेलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वपक्षीय बैठक बाेलाविली हाेती. तृणमूल काॅंग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकाच टप्प्यात मतदान घेण्याची आग्रही भूमिका मांडली हाेती.

काेराेना महामारी नियंत्रणात आणणे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत राजकारण दुय्यम आहे, असे मत तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी मांडले.  भाजपने लाेकशाही आणि सुरक्षेत संतुलन साधण्याचे निवडणूक आयाेगाला सुचविले हाेते.  एकाच टप्प्यात मतदान घेण्यास भाजपने विराेध केला हाेता. हीच भूमिका डाव्या पक्षांनीही घेतली. निवडणूकीचा कार्यक्रम नियाेजित वेळेनुसार झाला पाहिजे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता त्यात बदल करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका माकपचे खासदार बिकाश भट्टाचार्य यांनी मांडली. मात्र, सर्वपक्षीय बैठकीत तृणमूल काॅंग्रेस पक्ष एकटा पडला. 

काय म्हटले आयाेगाने-    निवडणूक आयाेगाने वाढत्या रुग्णसंख्येची दखल घेउन सर्व उमेदवार, स्टार प्रचारक तसेच राजकीय नेत्यांना काेराेनाच्या नियमावलीचे पालन करुन आदर्श घालून दाखविण्याचे आवाहन केले.-    आयाेगाने उर्वरित टप्प्यांच्या मतदानाच्या प्रचारासाठी वेळेची बंधने आणखी कडक केली आहेत. मतदानाच्या ७२ तास आधी प्रचार संपणार असून सायंकाळी ७ वाजेनंतर काेणत्याही प्रकारे प्रचारास बंदी घालण्यात आली आहे. -    प्रचार सभा, रॅली, राेड शाे इत्यादींवर सायंकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत निर्बंध घातले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान हाेणार आहे. त्यापैकी ४ टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्याचे मतदान आज हाेत आहे. तर उर्वरित तीन टप्प्यांसाठी ही बंधने घालण्यात आली आहेत.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग