शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

"गळा कापला तरी, ममता बॅनर्जी जिंदाबादच म्हणणार": अभिषेक बॅनर्जी

By देवेश फडके | Updated: February 28, 2021 17:32 IST

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणमूल काँग्रेसकडूनही जोरदार टक्कर दिली जाईल, असे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. अशातच तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काही झाले तरी भाजपच्या दबावासमोर झुकणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यात झालेल्या एका सभेला संबोधित करताना म्हटले आहे.

ठळक मुद्देअभिषेक बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोलसीबीआय आणि ईडी काही लावा मी घाबरत नाही - अभिषेक बॅनर्जीममता बॅनर्जी जिंदाबाद आणि तृणमूल काँग्रेस जिंदाबाद, अशा घोषणा देत राहणार

कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणमूल काँग्रेसकडूनही जोरदार टक्कर दिली जाईल, असे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. अशातच तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काही झाले तरी भाजपच्या दबावासमोर झुकणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यात झालेल्या एका सभेला संबोधित करताना म्हटले आहे. (west bengal assembly election 2021 tmc leader abhishek banerjee slams bjp)

"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गळा कापला, तरी जय हिंद, जय बांगला, जय मेदिनीपूर, ममता बॅनर्जी जिंदाबाद आणि तृणमूल काँग्रेस जिंदाबाद, अशा घोषणा देत राहणार. मला घाबरवण्याचा सुरू असलेला प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

मेदिनीपूर हा शुभेंदू अधिकारी यांचा गड मानला जातो. शुभेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सर्वांत जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ता मानले जात होते. मात्र, विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करायला सुरुवात केल्यानंतर गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

मी कोणालाही घाबरत नाही

सीबीआय आणि ईडी यांसारख्या तपास यंत्रणांचा वापर करत मला भीती घालू शकत नाही. शुभेंदू अधिकारी यांना घाबरवले गेले असले, तरी मी कोणालाही घाबरत नाही. भाजप करत असलेला अन्याय आणि पसरवत असलेल्या द्वेषाविरोधात मी नेहमीच बोलत राहणार. काही लोकांनी तपास यंत्रणांना घाबरून पक्षबदल केला. मात्र, ही तसे करणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केला. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांवर ममता बॅनर्जींनी आक्षेप घेतला आहे. भाजपच्या सोयीनुसार निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिका