शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"गळा कापला तरी, ममता बॅनर्जी जिंदाबादच म्हणणार": अभिषेक बॅनर्जी

By देवेश फडके | Updated: February 28, 2021 17:32 IST

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणमूल काँग्रेसकडूनही जोरदार टक्कर दिली जाईल, असे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. अशातच तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काही झाले तरी भाजपच्या दबावासमोर झुकणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यात झालेल्या एका सभेला संबोधित करताना म्हटले आहे.

ठळक मुद्देअभिषेक बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोलसीबीआय आणि ईडी काही लावा मी घाबरत नाही - अभिषेक बॅनर्जीममता बॅनर्जी जिंदाबाद आणि तृणमूल काँग्रेस जिंदाबाद, अशा घोषणा देत राहणार

कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणमूल काँग्रेसकडूनही जोरदार टक्कर दिली जाईल, असे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. अशातच तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काही झाले तरी भाजपच्या दबावासमोर झुकणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यात झालेल्या एका सभेला संबोधित करताना म्हटले आहे. (west bengal assembly election 2021 tmc leader abhishek banerjee slams bjp)

"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गळा कापला, तरी जय हिंद, जय बांगला, जय मेदिनीपूर, ममता बॅनर्जी जिंदाबाद आणि तृणमूल काँग्रेस जिंदाबाद, अशा घोषणा देत राहणार. मला घाबरवण्याचा सुरू असलेला प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

मेदिनीपूर हा शुभेंदू अधिकारी यांचा गड मानला जातो. शुभेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सर्वांत जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ता मानले जात होते. मात्र, विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करायला सुरुवात केल्यानंतर गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

मी कोणालाही घाबरत नाही

सीबीआय आणि ईडी यांसारख्या तपास यंत्रणांचा वापर करत मला भीती घालू शकत नाही. शुभेंदू अधिकारी यांना घाबरवले गेले असले, तरी मी कोणालाही घाबरत नाही. भाजप करत असलेला अन्याय आणि पसरवत असलेल्या द्वेषाविरोधात मी नेहमीच बोलत राहणार. काही लोकांनी तपास यंत्रणांना घाबरून पक्षबदल केला. मात्र, ही तसे करणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केला. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांवर ममता बॅनर्जींनी आक्षेप घेतला आहे. भाजपच्या सोयीनुसार निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिका