शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

मित्रांसह नूडल्स खाण्यास गेला, गो तस्कर समजून गोळ्या झाडल्या; पाच गोरक्षकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 10:04 IST

Haryana Crime News: गो तस्कर समजून पाच गोरक्षकांच्या गटाने १२वीच्या विद्यार्थ्याचा कारमध्ये पाठलाग करत त्याला गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी सौरभ, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा आणि आदेश या पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फरिदाबाद - गो तस्कर समजून पाच गोरक्षकांच्या गटाने १२वीच्या विद्यार्थ्याचा कारमध्ये पाठलाग करत त्याला गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी सौरभ, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा आणि आदेश या पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

२३ ऑगस्टच्या रात्री आरोपींनी विद्यार्थी आर्यन मिश्रा आणि त्याचे मित्र शांकी आणि हर्षित यांना गो तस्कर समजले आणि दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ३० किलोमीटरपर्यंत त्यांच्या कारचा पाठलाग केला. जेव्हा आर्यनला कार थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने कारचा वेग वाढवला, त्यानंतर आरोपींनी टोलनाक्यावर त्यांच्यावर गोळीबार केला. यात आर्यनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कार आणि अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

गोरक्षकांच्या गाडीवर पोलिसांसारखे दिवेआर्यन मिश्रा रात्री ११ वाजता मित्र शांकी आणि हर्षित, त्यांची आई श्वेता गुलाटी आणि दोन महिलांसोबत वर्धमान मॉलमध्ये नूडल्स खाण्यासाठी गेले होते. मात्र, नूडल्स खाऊन परतत असताना गोरक्षकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गोरक्षकांच्या गाडीवर पोलिसांसारखे दिवे होते. ते पाहून आर्यन घाबरला आणि त्याने कारचा वेग वाढविला. यावेळी गोरक्षकांनी त्याच्यावर गोळीबार केला. कार थांबल्यावर आर्यनवर पुन्हा एकदा आरोपींनी गोळी झाडली. मात्र, गाडीतील महिलांना पाहून आपण चुकीच्या लोकांच्या मागे लागल्याचे गोरक्षकांना वाटल्याने त्यांनी पळ काढला.

काँग्रेसची टीका- हरयाणातील भाजप सरकारचे १० वर्षांचे हे रिपोर्ट कार्ड आहे. येथे दिवसाढवळ्या रस्त्यावर लोकांची हत्या केली जात आहे.-येथे गुन्हेगार निर्भयपणे फिरत आहेत. त्यांच्या मनात कायद्याची भीतीन नाही.-भाजपच्या डबल इंजिन सरकारने हरयाणाला ‘क्राइम कॅपिटल’ बनवून सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

वडील म्हणाले, त्यांना  अधिकार कुणी दिला? - माझ्या मुलाला गो तस्कर समजून गोळ्या घालण्यात आल्या. गाय तस्करीच्या संशयावरून एखाद्याला गोळ्या घालण्याचा अधिकार या गोरक्षकांना कुणी दिला आहे?- तो अधिकार दिला असेल तर का दिला आहे? आम्ही पंडित आहोत. कोणाशीही वाद नव्हता, असे आर्यनचे वडील सियानंद मिश्रा यांनी म्हटले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा