शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मित्रांसह नूडल्स खाण्यास गेला, गो तस्कर समजून गोळ्या झाडल्या; पाच गोरक्षकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 10:04 IST

Haryana Crime News: गो तस्कर समजून पाच गोरक्षकांच्या गटाने १२वीच्या विद्यार्थ्याचा कारमध्ये पाठलाग करत त्याला गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी सौरभ, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा आणि आदेश या पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फरिदाबाद - गो तस्कर समजून पाच गोरक्षकांच्या गटाने १२वीच्या विद्यार्थ्याचा कारमध्ये पाठलाग करत त्याला गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी सौरभ, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा आणि आदेश या पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

२३ ऑगस्टच्या रात्री आरोपींनी विद्यार्थी आर्यन मिश्रा आणि त्याचे मित्र शांकी आणि हर्षित यांना गो तस्कर समजले आणि दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ३० किलोमीटरपर्यंत त्यांच्या कारचा पाठलाग केला. जेव्हा आर्यनला कार थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने कारचा वेग वाढवला, त्यानंतर आरोपींनी टोलनाक्यावर त्यांच्यावर गोळीबार केला. यात आर्यनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कार आणि अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

गोरक्षकांच्या गाडीवर पोलिसांसारखे दिवेआर्यन मिश्रा रात्री ११ वाजता मित्र शांकी आणि हर्षित, त्यांची आई श्वेता गुलाटी आणि दोन महिलांसोबत वर्धमान मॉलमध्ये नूडल्स खाण्यासाठी गेले होते. मात्र, नूडल्स खाऊन परतत असताना गोरक्षकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गोरक्षकांच्या गाडीवर पोलिसांसारखे दिवे होते. ते पाहून आर्यन घाबरला आणि त्याने कारचा वेग वाढविला. यावेळी गोरक्षकांनी त्याच्यावर गोळीबार केला. कार थांबल्यावर आर्यनवर पुन्हा एकदा आरोपींनी गोळी झाडली. मात्र, गाडीतील महिलांना पाहून आपण चुकीच्या लोकांच्या मागे लागल्याचे गोरक्षकांना वाटल्याने त्यांनी पळ काढला.

काँग्रेसची टीका- हरयाणातील भाजप सरकारचे १० वर्षांचे हे रिपोर्ट कार्ड आहे. येथे दिवसाढवळ्या रस्त्यावर लोकांची हत्या केली जात आहे.-येथे गुन्हेगार निर्भयपणे फिरत आहेत. त्यांच्या मनात कायद्याची भीतीन नाही.-भाजपच्या डबल इंजिन सरकारने हरयाणाला ‘क्राइम कॅपिटल’ बनवून सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

वडील म्हणाले, त्यांना  अधिकार कुणी दिला? - माझ्या मुलाला गो तस्कर समजून गोळ्या घालण्यात आल्या. गाय तस्करीच्या संशयावरून एखाद्याला गोळ्या घालण्याचा अधिकार या गोरक्षकांना कुणी दिला आहे?- तो अधिकार दिला असेल तर का दिला आहे? आम्ही पंडित आहोत. कोणाशीही वाद नव्हता, असे आर्यनचे वडील सियानंद मिश्रा यांनी म्हटले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा