शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

हजची सबसिडी बंद करण्याच्या निर्णयाचे स्वागतच पण मथुरा, मानस सरोवर यात्रेच्या सबसिडीचे काय? - असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 11:43 IST

केंद्र सरकारने काल हज यात्रेची सबसिडी बंद केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदू यात्रांच्या मुद्यावरुन मोदी सरकारला कोंडीत पकडले.

ठळक मुद्देभाजपा शासित हरयाणा सरकारने डेरा सच्चा सौदाला 1 कोटी रुपये का दिले ? महाकुंभवर मध्यप्रदेश सरकारने 3400 कोटी रुपये खर्च केले ते तुष्टीकरण नव्हे का ? मी हज यात्रेची सबसिडी बंद करण्याच्या विरोधात नाही उलट मी या निर्णयाचे स्वागत करतो.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने काल हज यात्रेची सबसिडी बंद केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदू यात्रांच्या मुद्यावरुन मोदी सरकारला कोंडीत पकडले. भाजपा, आरएसएसच्या मते हज यात्रेला दिली जाणारी सबसिडी म्हणजे तुष्टीकरण, मतपेटीचे राजकारण होते. मग भाजपा आता योगी आदित्यनाथ सरकारला अयोध्या, काशी, मथुरा यात्रेसाठी 800 कोटी रुपये देऊ नका असे सांगणार आहे का ?  मानस सरोवर यात्रेसाठी प्रत्येकी दीडलाख रुपयांचे अनुदान बंद होणार का ? असा प्रश्न ओवेसींनी विचारला आहे. 

भाजपा शासित हरयाणा सरकारने डेरा सच्चा सौदाला 1 कोटी रुपये का दिले ? महाकुंभवर मध्यप्रदेश सरकारने 3400 कोटी रुपये खर्च केले ते तुष्टीकरण नव्हे का ? असे सवाल ओवेसींनी विचारले आहेत. आगामी अर्थसंकल्पात मुस्लिम मुलींच्या स्कॉलरशिपसाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद  करण्याची मागणी त्यांनी केली. 

 

मी हज यात्रेची सबसिडी बंद करण्याच्या विरोधात नाही उलट मी या निर्णयाचे स्वागत करतो पण असे निर्णय घेताना त्यामध्ये दुटप्पीपणा असू नये. मी 2006 पासून हजची सबसिडी बंद करुन मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी तो निधी वापरण्याची मागणी करत आहे असे ओवेसी यांनी त्यांच्या टि्वटसमध्ये म्हटले आहे. 

 

केंद्र सरकारने काल हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही. हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण न करता अल्पसंख्यांकाना सक्षम करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे असे सरकारकडून सांगण्यात आले. 

 

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेचे अनुदान बंद करण्यात आल्याची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने 2012 साली 2022 पर्यंत टप्याटप्याने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिले होते. हज यात्रेच्या अनुदानाची रक्कम यापुढे शैक्षणिक सक्षमीकरण आणि अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येईल असे नक्वी यांनी सांगितले. 

केंद्र सरकारकडून दरवर्षी हज यात्रेवर अनुदानापोटी 700 कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. दरवर्षी लाखो लोक हजची यात्रा करतात. यावर्षी सुद्धा भारतातून 1.75 लाख लोक हज यात्रेला जाणार आहेत. पण त्यांना सरकारकडून कुठलेही अनुदान मिळणार नाही.                 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीHaj yatraहज यात्रा