शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

हवामानाने वर्षात घेतले २,२७० बळी; देशभरात वीज पडून सर्वाधिक १५८० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 05:37 IST

१९०१ नंतर २०२२ हे पाचवे सर्वांत अधिक तापमान असलेले वर्ष राहिले. सरासरी १०८ टक्के पाऊस झाला.

नवी दिल्ली : देशात गतवर्षी हवामान फारसे चांगले राहिले नाही. या काळात तापमानही वाढले आणि नंतर पाऊसही खूप झाला. या वर्षात हवामान बदलाच्या तडाख्यात २,२७० जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक १५८० लोकांचा मृत्यू वीज पडल्यामुळे झाला.

१९०१ नंतर २०२२ हे पाचवे सर्वांत अधिक तापमान असलेले वर्ष राहिले. सरासरी १०८ टक्के पाऊस झाला. सरासरी पावसात कर्नाटकनंतर राजस्थान देशात दुसऱ्या क्रमांकावर होते. येथे सरासरीच्या १३६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जीवित व वित्त हानीही मोठ्या प्रमाणावर झाली.

हवामान विभागाच्या पुणे स्थित क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस सेंटरच्या अहवालात हा खुलासा झाला आहे. या विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी हा अहवाल जारी केला आहे. या अहवालात हवामान बदलामुळे झालेल्या जीवित व वित्त हानीची माहितीही आहे.केंद्र सरकारच्या राज्यवार वार्षिक हवामान बाबतच्या २०२२ च्या अहवालानुसार देशात या वर्षात मोठा पाऊस, पूर आणि कडकडाटासह वीज पडणे यासारख्या घटना घडल्या. सर्वाधिक ५८९ लोकांचा मृत्यू उत्तर प्रदेशात झाला.

डोंगरी भागात उष्णता अधिकगतवर्षी पूर्ण देशातच तापमान सरासरीपेक्षा ०.५१ अंश सेल्सिअस अधिक नोंदले गेले. २०१६ मध्ये नोंदल्या गेलेल्या ०.७१ अंश सेल्सिअस तापमानापेक्षा हे कमी होते. मात्र, गतवर्षी डोंगरी भागात उष्णता अधिक होती. गत १०० वर्षांची सरासरी पाहिली तर हिमाचलमध्ये सर्वाधिक १.५ अंश सेल्सिअस तापमान वाढले. देशात गतवर्षी मार्च-एप्रिलमध्ये सहा दिवस कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ ते ८ अंश सेल्सिअस अधिक राहिले. त्रिपुरा, गोवा, पंजाब, नागालँड व सिक्कीममध्ये जीवित व वित्त हानी कमी झाली.

राजस्थानात उष्णता, पावसाच्याही धाराराजस्थानात गतवर्षी उष्णता अधिक होती. तसेच, पाऊसही जोरदार बरसला. राज्यात सरासरी तापमान २४.० अंश सेल्सिअस राहिले. हे प्रमाण सरासरीच्या ०.३ अंश सेल्सिअस अधिक आहे. राजस्थानात हे १९०१ नंतरचे १३ वे सर्वांत उष्णतेचे वर्ष ठरले. दोन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ६० टक्के, २२ जिल्ह्यांत सरासरीच्या २० ते ५९ टक्के पाऊस झाला. ९ जिल्ह्यांत मान्सून सामान्य राहिला. पावसाची सरासरी ४८६.६ मिमी आहे.