शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाने वर्षात घेतले २,२७० बळी; देशभरात वीज पडून सर्वाधिक १५८० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 05:37 IST

१९०१ नंतर २०२२ हे पाचवे सर्वांत अधिक तापमान असलेले वर्ष राहिले. सरासरी १०८ टक्के पाऊस झाला.

नवी दिल्ली : देशात गतवर्षी हवामान फारसे चांगले राहिले नाही. या काळात तापमानही वाढले आणि नंतर पाऊसही खूप झाला. या वर्षात हवामान बदलाच्या तडाख्यात २,२७० जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक १५८० लोकांचा मृत्यू वीज पडल्यामुळे झाला.

१९०१ नंतर २०२२ हे पाचवे सर्वांत अधिक तापमान असलेले वर्ष राहिले. सरासरी १०८ टक्के पाऊस झाला. सरासरी पावसात कर्नाटकनंतर राजस्थान देशात दुसऱ्या क्रमांकावर होते. येथे सरासरीच्या १३६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जीवित व वित्त हानीही मोठ्या प्रमाणावर झाली.

हवामान विभागाच्या पुणे स्थित क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस सेंटरच्या अहवालात हा खुलासा झाला आहे. या विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी हा अहवाल जारी केला आहे. या अहवालात हवामान बदलामुळे झालेल्या जीवित व वित्त हानीची माहितीही आहे.केंद्र सरकारच्या राज्यवार वार्षिक हवामान बाबतच्या २०२२ च्या अहवालानुसार देशात या वर्षात मोठा पाऊस, पूर आणि कडकडाटासह वीज पडणे यासारख्या घटना घडल्या. सर्वाधिक ५८९ लोकांचा मृत्यू उत्तर प्रदेशात झाला.

डोंगरी भागात उष्णता अधिकगतवर्षी पूर्ण देशातच तापमान सरासरीपेक्षा ०.५१ अंश सेल्सिअस अधिक नोंदले गेले. २०१६ मध्ये नोंदल्या गेलेल्या ०.७१ अंश सेल्सिअस तापमानापेक्षा हे कमी होते. मात्र, गतवर्षी डोंगरी भागात उष्णता अधिक होती. गत १०० वर्षांची सरासरी पाहिली तर हिमाचलमध्ये सर्वाधिक १.५ अंश सेल्सिअस तापमान वाढले. देशात गतवर्षी मार्च-एप्रिलमध्ये सहा दिवस कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ ते ८ अंश सेल्सिअस अधिक राहिले. त्रिपुरा, गोवा, पंजाब, नागालँड व सिक्कीममध्ये जीवित व वित्त हानी कमी झाली.

राजस्थानात उष्णता, पावसाच्याही धाराराजस्थानात गतवर्षी उष्णता अधिक होती. तसेच, पाऊसही जोरदार बरसला. राज्यात सरासरी तापमान २४.० अंश सेल्सिअस राहिले. हे प्रमाण सरासरीच्या ०.३ अंश सेल्सिअस अधिक आहे. राजस्थानात हे १९०१ नंतरचे १३ वे सर्वांत उष्णतेचे वर्ष ठरले. दोन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ६० टक्के, २२ जिल्ह्यांत सरासरीच्या २० ते ५९ टक्के पाऊस झाला. ९ जिल्ह्यांत मान्सून सामान्य राहिला. पावसाची सरासरी ४८६.६ मिमी आहे.