शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

काँग्रेसशिवाय दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा जिंकू : केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 17:39 IST

केंद्रातील मोदी सरकारला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र येत असताना, दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने एकेमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याचं दिसून येत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागा काँग्रेसशिवाय जिंकण्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.

केंद्रातील मोदी सरकारला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र येत असताना, दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने एकेमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, येणारी निवडणूक दिल्लीकरांसाठी महत्त्वपूर्ण आहे. यावेळी दिल्लीकर पंतप्रधान बनविण्यासाठी नव्हे तर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदान करतील. तर, दुसरीकडे दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित म्हणतात की, काँग्रेस पक्ष आम आदमी पक्षासोबत युती करणार नाही. परंतु अंतर्गत सर्व्हेमध्ये 'आप' दिल्लीतील सातही जागा जिंकणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. 

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे भाजपला नुकसान होणार असल्याचे सर्व्हेत समोर आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल पुढे म्हणाले की, राज्य घटनेत एका व्यक्तीला एक मत आहे. मात्र, दिल्लीतील एका व्यक्तीला अर्धे मत आहे. दिल्लीतील लोक केंद्र सरकारला दीड हजार कोटी रुपये टॅक्स देतात. पण, केंद्राकडून दिल्लीला केवळ 325 कोटी रुपये मिळतात. मागील 70 वर्षांपासून दिल्लीच्या लोकांचे शोषण होत, असल्याचेदेखील केजरीवाल यांनी म्हटले. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली होती. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे. तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला होता. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक