शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 07:06 IST

लवकरात लवकर निकाल देण्याचं सर्वोच्च न्यायालयाला आवाहन

लखनऊ: अयोध्या प्रकरणाचा निकाल 24 तासांच्या आत लावून दाखवण्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. राम मंदिराच्या प्रश्नावर लोकांचा संयम संपत आला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय याबद्दलचा निकाल देत नाही. त्यामुळे हे प्रकरण आमच्याकडे सोपवा. चोवीस तासांच्या आत या प्रश्नावर मार्ग काढू, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. अयोध्या प्रश्नावर मार्ग कसा निघणार? संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटणार की आणखी काही करणार?, असे प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आले. त्यावर न्यायालयाला हे प्रकरण आमच्याकडे सोपवू तर द्या, असं उत्तर आदित्यनाथ यांनी दिलं. 'हा वाद लवकर संपुष्टात आणावा, असं आवाहन मी न्यायालयाला करतो. रामजन्मभूमीच्या वादावार अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 30 सप्टेंबर 2010 मध्ये आदेश दिलेला नाही. हिंदू मंदिर नष्ट करण्यासाठी इथे बाबरी मशीद उभारण्यात आली, ही बाब न्यायालयानं स्वीकारली आहे. उच्च न्यायालयाच्या सुचनेवरून पुरातत्व विभागानं त्या ठिकाणी खोदकाम केलं. हिंदू मंदिर किंवा स्मारक नष्ट करण्यासाठीच बाबरीचा ढाचा उभारला गेला, असा अहवाल पुरातत्व विभागानं न्यायालयाला दिला आहे,' असं योगी म्हणाले. अयोध्या प्रकरणात न्यायालयानं लवकरात लवकर निकाल द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. 'निकाल देण्यासाठी अनावश्यक विलंब झाल्यास लोकांचा संस्थांवरील विश्वास उडेल. त्यामुळे संकट निर्माण होत आहे,' असं योगी म्हणाले. 'न्यायालयाला लवकर निकाल देणं जमत नसेल, तर त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे सोपवावं. आम्ही अवघ्या 24 तासांमध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकू,' असा दावा त्यांनी केला. या प्रकरणी मोदी सरकारनं अध्यादेश का आणला नाही, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना योगींनी पुन्हा न्यायालयाचा उल्लेख केला. न्यायप्रविष्ट प्रकरणांवर संसदेत चर्चा होऊ शकत नाही. आम्ही हा विषय न्यायालयावर सोडला आहे, असं ते म्हणाले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय