शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

"राफेलच्या बातम्या देणाऱ्या माध्यमांवर कारवाई झाल्यास आम्ही विरोध करू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:10 IST

प्रसारमाध्यमांनी बातम्या दिल्या त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केलेल्या वक्तव्याचा एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

नवी दिल्ली : राफेल विमाने खरेदीबाबत ज्या दस्तावेजांच्या आधारे प्रसारमाध्यमांनी बातम्या दिल्या त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केलेल्या वक्तव्याचा एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या बातम्या छापल्याबद्दल प्रसारमाध्यमांवर आॅफिशिअल सिक्रेटस् कायद्यान्वये कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला तर ते निंदनीय कृत्य ठरेल. त्याला आम्ही तीव्र विरोध करू, असा इशाराही या संघटनेने दिला आहे.एडिटर्स गिल्ड आॅफ इंडियाने याबाबत एक सविस्तर निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, देशातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा कोणताही निर्णय घेण्यापासून केंद्र सरकारने स्वत:ला रोखावे. सध्या गाजत असलेल्या राफेल विमानांच्या खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा, अशी विनंती करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावावी, असे अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी बुधवारी युक्तिवादात म्हटले होते.संरक्षण मंत्रालयातील राफेल विमानांबाबतच्या फायलींतून चोरीला गेलेल्या दस्तावेजांमधील माहितीवर आधारित ही नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. फायली चोरीच्या खुलाशानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. राफेल विमानांच्या व्यवहाराबद्दलच्या कागदपत्रांची चोरी होणे हा गुन्हा आहे का? तसेच त्यामुळे आॅफिशियल सिक्रेट्स कायद्याचा भंग झाला आहे का? याचीही चौकशी करण्यात येत आहे, असे विधान वेणुगोपाल यांनी केले होते.मात्र, या प्रकरणी कोणत्याही पत्रकार किंवा वकिलाविरोधात केंद्र सरकारकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार नाही, असेही वेणुगोपाल यांनी नंतर स्पष्ट केले होते. तरीही सरकार आॅफिशिअल सिक्रेटस् अ‍ॅक्टद्वारे कारवाई करू पाहत असल्याची शंका एडिटर्स गिल्डने व्यक्त केली आहे.>चंद्राबाबूंनीही केला निषेधहिंदू वृत्तपत्राविरोधात आॅफिशिअल सिक्रेटस् कायद्यान्वये कारवाई करण्याच्या केंद्राने दिलेल्या इशाऱ्याचा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांना गप्प बसविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार घटनाबाह्य मार्गांचा अवलंब करीत आहे. राफेलमध्ये घोटाळे झाल्याच्या प्रसारमाध्यमांनी बातम्या छापल्या असल्या तरी वस्तुस्थिती तशी नाही हे केंद्र सरकारने या व्यवहाराच्या निष्पक्षपाती चौकशीद्वारे सिद्ध केले पाहिजे; पण त्याऐवजी केंद्र सरकार प्रसारमाध्यमांवरच गुरकावत आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील