शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"आम्ही कधीही लग्न करणार नाही’’, १२ तरुणींनी घेतला अजब निर्णय, कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:32 IST

Haryana News: फरिदाबादमधील सराय येथील १२ तरुणींनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या एकच चर्चा सुरू आहे. या तरुणींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आता कधीही लग्न करणार नाहीत. लग्नापेक्षा स्वत:च्या पायावर उभं राहणं आणि समाजासाठी चांगलं काम करण्याची अधिक आवश्यकता आहे, असं या तरुणींचं मत आहे.

फरिदाबादमधील सराय येथील १२ तरुणींनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या एकच चर्चा सुरू आहे. या तरुणींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आता कधीही लग्न करणार नाहीत. लग्नापेक्षा स्वत:च्या पायावर उभं राहणं आणि समाजासाठी चांगलं काम करण्याची अधिक आवश्यकता आहे, असं या तरुणींचं मत आहे. या मुलींच्या गटामधील एक सदस्य असलेल्या मीनू गोयल हिने आम्ही एक समाजसेवा करत आहोत, असं सांगितलं. 

मीनू गोयल हिने सांगितले की, मी आता कधीही विवाह करणार नाही. आम्ही १२  तरुणी एकत्र मिळून समाजासाठी काम करत आहोत. आम्हा सर्वांचं आपापलं काम आहे. तसेच आम्ही सर्वांनी खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. मीनूने सांगितलं की, लग्न करणं हे इतकं महत्त्वाचं नाही. तर  स्वत:च्या पायावर उभं राहणं आणि समाजाची सेवा करणं हे अधिक आवश्यक आहे. मीनू हिचं वय सध्या ३० वर्षे आहे. तसेच या वयात लग्न नाही तर समाजासाठी काम करणं महत्त्वाचं असल्याचं मत तिने मांडलं आहे.

मीनू गोयल हिच्या कुटुंबामध्ये चार बहिणी एक भाऊ आणि एक पुतण्या आहे. मीनू या सर्वांमधील तिसरं भावंड आहे. तिच्या दोन बहिणींचा आधीच विवाह झालेला आहे.  मीनू सांगते की, आपल्या मुलांनी वेळेत लग्न करावं, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. मात्र आपलं लेकरू समाजासाठी काही तरी करत आहे, हे पाहतील, तेव्हा ते खूश होतील. मीनू हिने सांगितलं की, तिला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे. तसेच आपली मुलगी समाजासाठी काहीतरी करते आहे, याचा त्यांना अभिमान आहे.

मीनू सांगते की, त्यांना आता केवळ समाजासाठी काम करायचं आहे. त्यांचा उद्देश लोकांची मदत करणे आणि समाजामध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणणे हाच आहे. त्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती संघर्ष करते, तेव्हा समाज त्यांना खऱ्या उद्देशासह येऊन भेटतो. अशा प्रकारे मीनू आणि तिच्या सहकारी समाजासाठी प्रेरणा बनल्या आहेत.  

टॅग्स :marriageलग्नHaryanaहरयाणा