शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

... तो भ्याड हल्ला आम्ही कधीही विसरू शकत नाही, मोदींकडून शहिदांना आदरांजली

By महेश गलांडे | Updated: December 13, 2020 08:10 IST

देशाच्या संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्षे पूर्ण होत असले तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकसभेचं हिवाळी सत्र सुरू असतानाच लष्कार ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला.

ठळक मुद्देदेशाच्या संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्षे पूर्ण होत असले तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकसभेचं हिवाळी सत्र सुरू असतानाच लष्कार ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला

नवी दिल्ली - लोकशाहीचं पवित्र मंदिर असलेल्या नवी दिल्लीतीलसंसद भवनावर 13 डिसेंबर 2001 रोजी 'न भूतो न भविष्यति' अशी घटना घडली. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. देशाच्या लोकतंत्राचे मंदिर समजल्या जाणाऱ्या संसदेत झालेला हा हल्ला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जवानांचा मृत्यू हा संपूर्ण देशासाठी धक्कादायक बाब होती, भारतीय संविधानाला धक्का पोहोचविणारा हा हल्ला होता. या हल्ल्यात दिल्ली पोलीसचे 5 जवान, संसदेचे 2 सुरक्षा रक्षक शहीद झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्षे पूर्ण होत असले तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकसभेचं हिवाळी सत्र सुरू असतानाच लष्कार ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मदच्या 5 आतंकवाद्यांनी 13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी 11.40 वाजता अॅम्बेसेडर मधून संसद परिसरात प्रवेश केला. त्यांच्या येण्यापूर्वीच 40 मिनिटांअगोदर लोकसभा आणि राज्यसभा स्थगित झाली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 100 नेते त्यावेळी संसदेत उपस्थित होते. 

लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचविण्यासाठी, या मंदिरातील नेतेमंडळींना वाचविण्यासाठी सैन्य दलाच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यामध्ये, दिल्ली पोलिसांच्या 5 तर संसद भवनाच्या 2 सुरक्षा रक्षकांना वीरमरण आलं. दिल्ली पोलिसचे जवान नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, बिजेंद्र सिंह आणि घनश्याम तथा केंद्रीय रिजर्व पोलीस बलाची महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी आणि संसद सुरक्षेचे 2 सुरक्षा सहायक जगदीश प्रसाद यादव आणि मातबर सिंह नेगी यांनी या हल्ल्यात प्राणांची आहुती दिली सोशल मीडियातून आज भारतमातेच्या या वीरपुत्रांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटरवरुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, संसद भवनावरील तो भ्याड हल्ला आम्ही कधीही विसरू शकत नाही,  या हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करतो, देश कायमस्वरुपी त्यांच्या आभारी असेन, असे ट्विट मोदींनी केलंय. 

 

दरम्यान, या संपूर्ण अतिरेकी कारवाईचा मास्टर माईंड अफजल गुरु या अतिरेक्याला 15 डिसेंबर 2001 मध्ये जम्मू-काश्मीर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन त्यास फाशी देण्यात आली. अफजल गुरुला फाशी शिक्षा देण्यासाठी देशाला 12 वर्षे वाट पाहावी लागली. 9 फेब्रुवारी 2013 ला तिहार जेलमध्ये त्याला फाशी देण्यात आली.

टॅग्स :Parliamentसंसदdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीTerror Attackदहशतवादी हल्ला