शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

... तो भ्याड हल्ला आम्ही कधीही विसरू शकत नाही, मोदींकडून शहिदांना आदरांजली

By महेश गलांडे | Updated: December 13, 2020 08:10 IST

देशाच्या संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्षे पूर्ण होत असले तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकसभेचं हिवाळी सत्र सुरू असतानाच लष्कार ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला.

ठळक मुद्देदेशाच्या संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्षे पूर्ण होत असले तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकसभेचं हिवाळी सत्र सुरू असतानाच लष्कार ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला

नवी दिल्ली - लोकशाहीचं पवित्र मंदिर असलेल्या नवी दिल्लीतीलसंसद भवनावर 13 डिसेंबर 2001 रोजी 'न भूतो न भविष्यति' अशी घटना घडली. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. देशाच्या लोकतंत्राचे मंदिर समजल्या जाणाऱ्या संसदेत झालेला हा हल्ला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जवानांचा मृत्यू हा संपूर्ण देशासाठी धक्कादायक बाब होती, भारतीय संविधानाला धक्का पोहोचविणारा हा हल्ला होता. या हल्ल्यात दिल्ली पोलीसचे 5 जवान, संसदेचे 2 सुरक्षा रक्षक शहीद झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्षे पूर्ण होत असले तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकसभेचं हिवाळी सत्र सुरू असतानाच लष्कार ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मदच्या 5 आतंकवाद्यांनी 13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी 11.40 वाजता अॅम्बेसेडर मधून संसद परिसरात प्रवेश केला. त्यांच्या येण्यापूर्वीच 40 मिनिटांअगोदर लोकसभा आणि राज्यसभा स्थगित झाली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 100 नेते त्यावेळी संसदेत उपस्थित होते. 

लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचविण्यासाठी, या मंदिरातील नेतेमंडळींना वाचविण्यासाठी सैन्य दलाच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यामध्ये, दिल्ली पोलिसांच्या 5 तर संसद भवनाच्या 2 सुरक्षा रक्षकांना वीरमरण आलं. दिल्ली पोलिसचे जवान नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, बिजेंद्र सिंह आणि घनश्याम तथा केंद्रीय रिजर्व पोलीस बलाची महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी आणि संसद सुरक्षेचे 2 सुरक्षा सहायक जगदीश प्रसाद यादव आणि मातबर सिंह नेगी यांनी या हल्ल्यात प्राणांची आहुती दिली सोशल मीडियातून आज भारतमातेच्या या वीरपुत्रांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटरवरुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, संसद भवनावरील तो भ्याड हल्ला आम्ही कधीही विसरू शकत नाही,  या हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करतो, देश कायमस्वरुपी त्यांच्या आभारी असेन, असे ट्विट मोदींनी केलंय. 

 

दरम्यान, या संपूर्ण अतिरेकी कारवाईचा मास्टर माईंड अफजल गुरु या अतिरेक्याला 15 डिसेंबर 2001 मध्ये जम्मू-काश्मीर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन त्यास फाशी देण्यात आली. अफजल गुरुला फाशी शिक्षा देण्यासाठी देशाला 12 वर्षे वाट पाहावी लागली. 9 फेब्रुवारी 2013 ला तिहार जेलमध्ये त्याला फाशी देण्यात आली.

टॅग्स :Parliamentसंसदdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीTerror Attackदहशतवादी हल्ला