शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘मनरेगा’ची मजुरी  ४०० रुपये करू, महिला बनतील लखपती : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 07:32 IST

मध्य प्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघांतील सेगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते.

खरगोन (मध्य प्रदेश) : निवडणुकीनंतर केंद्रात आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल; तसेच ‘मनरेगा’अंतर्गत दिली जाणारी मजुरी २५० रुपयांवरून ४०० रुपये केली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघांतील सेगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. काँग्रेसने खरगोन (अनुसूचित जमाती) आणि खांडवा लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे पोरलाल खरते आणि नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ‘राज्यघटना, आरक्षण, सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योग व आदिवासींच्या जल, जंगलांवरील हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास गरीब महिलांना करोडपती बनविण्यासाठी त्यांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करणार आहे’, असे ते म्हणाले.   

आरक्षणाची मर्यादा वाढवणारभाजप सत्तेत आल्यास आदिवासी, दलित व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण हिरावून घेईल. त्यांचे नेते तसे स्पष्टपणे सांगत आहेत. आम्ही कोणाचेही आरक्षण न काढता उलट ते वाढवणार आहोत. न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के केली आहे. ही मर्यादा आम्ही हटवू, असे राहुल म्हणाले. मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी जातिनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाचे समर्थन केले. यातून लोकांची वास्तविक स्थिती समोर येईल आणि देशातील राजकारणाची दिशा बदलेल, असेही ते म्हणाले. 

‘१५० जागाही त्यांना मिळणार नाही’भाजपने राज्यघटना बदलण्याच्या  उद्देशाने ४०० पारची घोषणा दिली आहे. ४०० सोडा त्यांना यावेळी १५० हून अधिक जागा मिळणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधी आघाडी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी कृषी उत्पादनाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुनिश्चित करण्यासाठी कायदा करेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४