शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘मनरेगा’ची मजुरी  ४०० रुपये करू, महिला बनतील लखपती : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 07:32 IST

मध्य प्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघांतील सेगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते.

खरगोन (मध्य प्रदेश) : निवडणुकीनंतर केंद्रात आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल; तसेच ‘मनरेगा’अंतर्गत दिली जाणारी मजुरी २५० रुपयांवरून ४०० रुपये केली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघांतील सेगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. काँग्रेसने खरगोन (अनुसूचित जमाती) आणि खांडवा लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे पोरलाल खरते आणि नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ‘राज्यघटना, आरक्षण, सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योग व आदिवासींच्या जल, जंगलांवरील हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास गरीब महिलांना करोडपती बनविण्यासाठी त्यांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करणार आहे’, असे ते म्हणाले.   

आरक्षणाची मर्यादा वाढवणारभाजप सत्तेत आल्यास आदिवासी, दलित व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण हिरावून घेईल. त्यांचे नेते तसे स्पष्टपणे सांगत आहेत. आम्ही कोणाचेही आरक्षण न काढता उलट ते वाढवणार आहोत. न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के केली आहे. ही मर्यादा आम्ही हटवू, असे राहुल म्हणाले. मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी जातिनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाचे समर्थन केले. यातून लोकांची वास्तविक स्थिती समोर येईल आणि देशातील राजकारणाची दिशा बदलेल, असेही ते म्हणाले. 

‘१५० जागाही त्यांना मिळणार नाही’भाजपने राज्यघटना बदलण्याच्या  उद्देशाने ४०० पारची घोषणा दिली आहे. ४०० सोडा त्यांना यावेळी १५० हून अधिक जागा मिळणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधी आघाडी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी कृषी उत्पादनाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुनिश्चित करण्यासाठी कायदा करेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४