शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळली तर आम्ही तत्काळ हस्तक्षेप करू: सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:05 IST

ज्या १५ लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे आणि याचिकाकर्ते म्हणताहेत की, ते जिवंत आहेत, त्यांना समोर आणावे, असे आदेशही दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक आयोग ही कायद्यानुसार काम करणारी संवैधानिक संस्था आहे. मात्र, बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणात मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्यास तत्काळ हस्तक्षेप करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे.

न्या. सूर्यकांत व जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर विचार करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आणि सांगितले की, या मुद्द्यावर १२ आणि १३ ऑगस्ट रोजी सुनावणी होईल. ज्या १५ लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे आणि याचिकाकर्ते म्हणताहेत की, ते जिवंत आहेत, त्यांना समोर आणावे, असे आदेशही दिले.

याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण यांनी पुन्हा एकदा आरोप केला की, निवडणूक आयोग १ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणाऱ्या प्रारूप यादीतून लोकांना वगळत आहे व त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार गमवावा लागेल.

मतांची चोरी बंद करा : विरोधक

बिहारमधील मतदार याद्यांच्या सखोल पुनरावलोकनाच्या मुद्द्यावरून (एसआयआर) आक्रमक झालेल्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मंगळवारी संसदेच्या परिसरात उग्र निदर्शने केली. हा निर्णय मागे घेण्याची मागणी या पक्षांनी केली. संसदेच्या मकर द्वार भागात विरोधी पक्षांनी ही निदर्शने करीत जोरदार घोषणाबाजी केली. ‘मतांची चोरी बंद करा’ अशा घोषणा या पक्षांनी दिल्या. आयोगाने बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाचा घेतलेला निर्णय म्हणजे मतांची लूट असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. संसदेतही हे पक्ष एकत्रित आले होते. या पक्षांनी आता संसदेबाहेरही निदर्शने सुरू केली आहेत.

६५ लाख नावे वगळली तर आमच्या लक्षात आणून द्या

राजद खा. मनोज झा यांची बाजू मांडताना सिब्बल म्हणाले की, हे ६५ लाख लोक कोण आहेत, हे निवडणूक आयोगाला माहिती आहे. त्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट केली तर कोणाला काहीच समस्या येणार नाही. न्या. सूर्यकांत म्हणाले की, प्रारूप मतदार यादीत यांचा समावेश केलेला नसेल तर तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या. आयोगाची बाजू मांडणारे वकील राकेश द्विवेदी म्हणाले की, मसुदा यादी प्रकाशित झाल्यानंतरही गणना अर्ज दाखल करता येतो. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग