शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"दहशतवाद्यांना सोडणार नाही"; जम्मू काश्मीरमध्ये ७ जणांच्या हत्येनंतर भडकले अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 11:16 IST

Amit Shah : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कडक इशारा दिला आहे.

Ganderbal Terrorist Attack: जम्मू काश्मीरमध्ये नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं आहे. दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा परप्रांतिय नागरिकांच्या हत्या करण्यात येत आहेत. रविवारी श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील झोजिलाच्या पायथ्याशी असलेल्या गगनगीर सोनमर्ग येथील जैदमोध बोगदा प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात कामगारांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. पोलीस आणि लष्कराने कामगार छावणी आणि लगतच्या परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांसह ७ जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात पाच कामगार जखमी असून सर्व जखमींना उपचारासाठी सौरा येथील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे या भ्याड हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राहुल गांधी,  मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तसेच जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्याचा निषेध करण्यासोबतच गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवाद्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला आहे.

'जम्मू-काश्मीरमधील गांदरबलमधील नागरिकांवर झालेला हा भ्याड दहशतवादी हल्ला भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना आमच्या सुरक्षा दलांच्या कठोर प्रत्युत्तराचा सामना करावा लागेल. या दु:खाच्या प्रसंगी, मी मृतांच्या कुटुंबीयांसाठी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो," असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

"जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टर आणि स्थलांतरित मजुरांसह अनेकांची हत्या हा अत्यंत भ्याड आणि अक्षम्य गुन्हा आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्याची आशा व्यक्त करतो. दहशतवाद्यांचा हा धाडसीपणा जम्मू-काश्मीरमधील बांधकाम आणि लोकांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात संपूर्ण देश एकत्र आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शाहterroristदहशतवादीRahul Gandhiराहुल गांधी