शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची सर्व कारस्थाने आम्ही हाणून पाडू : काँग्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 06:27 IST

४५ पदांसाठी थेट भरती रद्द करण्याच्या निर्णयानंतर टीका 

नवी दिल्ली: राज्यघटनेचे सामर्थ्य हुकूमशाही प्रवृत्तीच्या राजवटीच्या अहंकाराचा पराभव करू शकते, हे ४५ पदांसाठी थेट भरतीची प्रक्रिया व त्याची जाहिरात रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्यावरून दिसून आले, अशी टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या अन्य नेत्यांनी केली आहे. 

राहुल गांधी यांनी म्हटले की, राज्यघटना व आरक्षण या दोन्ही गोष्टींचे काँग्रेस प्राणपणाने रक्षण करणार असून भाजपाची सर्व कारस्थाने आम्ही हाणून पाडू. केंद्र सरकारच्या मंत्रालयांमध्ये विविध पदांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची होणारी थेट भरती तसेच ती जाहिरातही रद्द करावी असा आदेश देणारे पत्र मंत्री जितेंद्र सिंह यांनी यूपीएससीच्या अध्यक्ष प्रीती सूदन यांना लिहिले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे उद्‌गार काढले आहेत.

पत्रावर तारीखच नाही : काँग्रेस सिंह यांनी यूपीएससीच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावर तारीखच नमूद नाही. या सरकारचा कारभार अतिशय वाईट आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेमुळेच यूपीएससीकडून होणारी थेट भरती सरकारला रद्द करावी लागली, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी केला.

मंत्री चिराग पासवान यांनी मानले पंतप्रधानांचे आभार केंद्रीय खात्यांमधील विविध ४५ पदांसाठी करण्यात येणारी थेट भरती रद्द केल्याबद्दल केंद्रीय मंत्री व लोक जनशक्त्ती पार्टीचे (राम- विलास पासवान) अध्यक्ष चिराग पासवान यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ते म्हणाले की, एससी, एसटी व मागास- वर्गीय गटातील लोकांना वाटणारी चिंता ओळखून मोदी यांनी योग्य तो निर्णय घेतला. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचे नियम पाळूनच भरती करण्यात आली पाहिजे, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी या विषयावर सविस्तर चर्चा केली, असेही चिराग पासवान यांनी सांगितले.

भारतीय राज्यघटना चिरायू होवो : खरगे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, भारतीय राज्यघटना चिरायू होवो असे याप्रसंगी म्हणावेसे वाटते. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी काँग्रेस लढा देत आहे. या गटांचे आरक्षण हिरावून घेण्याचा भाजपचा डाव आम्ही हाणून पाडला आहे. भारतीय राज्यघटनेच्या सामर्थ्यामुळे हुकूमशाही राजवटीच्या अहंकाराचा पराभव झाला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस