शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जाविषयक करारांचे आम्ही नक्की पालन करू - सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 04:50 IST

वचनबद्धता पाळली जाईल, गुंतवणूकदारांनी चिंता करू नये

नवी दिल्ली : विविध ऊर्जा करारानुसार गुंतवणूकदारांना दिलेले आश्वासन आणि जबाबदाऱ्या भारत पूर्णपणे निभावण्यास वचनबद्ध आहे, विशेषत: नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील करारांबाबतची वचनबद्धता प्रामुख्याने पाळली जाईल, गुंतवणूकदारांनीचिंता करू नये, अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

‘सेराविक’च्या ‘इंडिया एनर्जी फोरम’मध्ये सीतारामन म्हणाल्या की, करारांचा सन्मान करीत आहोत.ज्यांनी भारताची ऊर्जा क्षमता वाढविण्यासाठी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी याबाबत निश्चिंत रहावे. या क्षेत्रात येणारा काही काळ अनिश्चितता राहणार आहे पण वचनबद्धता पाळली जाईल, अशी ग्वाही मी त्यांना देते.

वीज खरेदी करार झालेल्या नूतनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या दरात कपात करण्याची मागणी आंध्र प्रदेश सरकारने अलीकडेच सौरऊर्जा महामंडळ व एनटीपीसी यांच्यांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये आधीच गुंतवणूक करणाºया गुंतवणूकदार संस्थांना चिंता वाटते आहे.विजेचे दर कमी झाल्यास गुंतवणूक कशी भरून निघणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. त्यानुषंगाने निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले आहे.वीजखरेदीबाबत साशंकतेचा परिणामउच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, वीज खरेदी करारांच्या पालनाबाबतशंका निर्माण झाल्यामुळे नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातीलगुंतवणूकदारांच्या धारणेवर परिणाम झाला आहे. नूतनीकरणीयऊर्जा क्षेत्रातून २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत भारताला मोठ्या गुंतवणुकीची गरज लागणार आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन