शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

आम्ही आमचा संयम गमावला; रेशन कार्डवरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 09:12 IST

खंडपीठाने म्हटले की, आम्ही हे स्पष्ट करत आहोत की, यापुढे कोणतीही उदारता दाखवली जाणार नाही. आम्ही तुम्हाला आदेशाचे पालन करण्याची शेवटची संधी देत आहोत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्थलांतरित कामगारांना राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात होत असलेल्या विलंबावर चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही आमचा संयम गमावला आहे. 

न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानउल्लाह यांच्या खंडपीठाने केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक पावले उचलण्यासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत अखेरची संधी दिली आहे. खंडपीठाने म्हटले की, आम्ही संयम गमावला आहे. आम्ही हे स्पष्ट करत आहोत की, यापुढे कोणतीही उदारता दाखवली जाणार नाही. आम्ही तुम्हाला आदेशाचे पालन करण्याची शेवटची संधी देत आहोत. अन्यथा तुमच्या सचिवांना हजर राहावे लागेल. 

केंद्रातर्फे हजर असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी खंडपीठाला सांगितले की, अंत्योदय अन्न योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला एकच रेशनकार्ड दिले जाते. कोरोना साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांचे आताेनात हाल झाले. या कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि परिस्थितीची न्यायालयाने २०२० मध्ये स्वत:हून दखल घेतली होती. त्यावर सर्वाेच्च न्यायालय सुनावणी करत आहे.

काय कार्यवाही केली?

स्थलांतरित कामगारांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत आणि त्यांच्यासाठी इतर कल्याणकारी पावले उचलण्यासंदर्भात काय कार्यवाही केली, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे न्यायालयाने यापूर्वी सांगितले होते. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय