शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

LOC वर कोणतीही हालचाल खपवून घेणार नाही; भारतीय लष्कराचा पाकला सज्जड दम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:32 IST

जर पाकिस्तानकडून एलओसी काही हालचाली झाल्या तर भारतीय लष्कर सज्ज आहे.

नवी दिल्ली - कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे. त्यामुळे एलओसीवर पाकिस्तानकडून हालचाली सुरु झाल्याचं निदर्शनास येत आहे. लडाखच्या सीमेजवळ पाकिस्तानकडून लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. या घटनांवर भारतीय गुप्तचर संस्था नजर ठेऊन आहेत. याबाबत भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. 

लष्कर प्रमुख बिपीन रावत म्हणाले की, जर पाकिस्तानकडून एलओसी काही हालचाली झाल्या तर भारतीय लष्कर सज्ज आहे. पाकिस्ताना चोख उत्तर देऊ, असं रावत यांनी बजावलं आहे. काश्मीरमधील लोकांची आमचं बोलणं सुरु आहे. आता त्याठिकाणी पहिल्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. पहिले आम्ही त्यांना बंदूक हातात घेऊन भेटत होतो आता विना बंदूक काश्मिरी लोकांशी संवाद साधत आहोत. 

याआधी पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर याने दावा केला आहे की, सशस्त्र हत्यारे घेऊन पाकिस्तानचे लष्कर एलओसीवर तैनात आहेत. आणखी काही मनुष्यबळ, हत्यारे घेऊन पाकिस्तानी सेना पाकव्याप्त काश्मीरकडे रवाना होत आहेत. पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तानी लष्कराची हालचाल वाढली आहे. कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानकडून भारतासोबत व्यापारी, राजकीय संबंध तोडले आहेत. तर समझोता एक्सप्रेसही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मागील सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक आणि कलम 370 हटवण्याच्या शिफारशीचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव राज्यसभेत पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींकडून कलम 370 हटवण्याच्या शिफारशीला मान्यता देण्यात आली. जम्मू काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी केंद्र सरकारकडून आधीच खबरदारी घेण्यात आली होती. अतिरिक्त जवानांचा फौजफाटा काश्मीरमध्ये पाठविण्यात आला होता. तर राज्यभरात कलम 144 लागू करण्यात आलं होतं. सुरक्षेची पुरती काळजी घेतल्यानंतर केंद्र सरकारकडून संसदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. 

या प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं की, जेव्हा मी जम्मू-काश्मीर राज्य असा उल्लेख करतो, त्यात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनही येतं. काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा संसदेला अधिकार आहे. त्यासाठी कुणाचीही संमती घ्यायची गरज नाही. संसद हे सर्वोच्च सभागृह आहे, असंही अमित शाह म्हणाले होते. तसेच पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान