शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
2
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
3
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
4
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
5
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
6
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
7
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
8
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
9
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
10
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Nagpur: तुला नोकरी मिळवून देतो, आधी माझ्याशी...; विश्वास टाकून फसली अन् महिला कबड्डीपटूला आयुष्याला मुकली
12
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
13
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
15
डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
16
सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया
17
बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार? 'या' चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत; कुणाला सर्वाधिक संधी?
18
शेतकऱ्यांच्या लेकींची उत्तुंग भरारी; ५ मुली झाल्या RAS अधिकारी, एकेकाळी फीसाठी नव्हते पैसे
19
IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
20
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
Daily Top 2Weekly Top 5

LOC वर कोणतीही हालचाल खपवून घेणार नाही; भारतीय लष्कराचा पाकला सज्जड दम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:32 IST

जर पाकिस्तानकडून एलओसी काही हालचाली झाल्या तर भारतीय लष्कर सज्ज आहे.

नवी दिल्ली - कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे. त्यामुळे एलओसीवर पाकिस्तानकडून हालचाली सुरु झाल्याचं निदर्शनास येत आहे. लडाखच्या सीमेजवळ पाकिस्तानकडून लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. या घटनांवर भारतीय गुप्तचर संस्था नजर ठेऊन आहेत. याबाबत भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. 

लष्कर प्रमुख बिपीन रावत म्हणाले की, जर पाकिस्तानकडून एलओसी काही हालचाली झाल्या तर भारतीय लष्कर सज्ज आहे. पाकिस्ताना चोख उत्तर देऊ, असं रावत यांनी बजावलं आहे. काश्मीरमधील लोकांची आमचं बोलणं सुरु आहे. आता त्याठिकाणी पहिल्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. पहिले आम्ही त्यांना बंदूक हातात घेऊन भेटत होतो आता विना बंदूक काश्मिरी लोकांशी संवाद साधत आहोत. 

याआधी पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर याने दावा केला आहे की, सशस्त्र हत्यारे घेऊन पाकिस्तानचे लष्कर एलओसीवर तैनात आहेत. आणखी काही मनुष्यबळ, हत्यारे घेऊन पाकिस्तानी सेना पाकव्याप्त काश्मीरकडे रवाना होत आहेत. पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तानी लष्कराची हालचाल वाढली आहे. कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानकडून भारतासोबत व्यापारी, राजकीय संबंध तोडले आहेत. तर समझोता एक्सप्रेसही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मागील सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक आणि कलम 370 हटवण्याच्या शिफारशीचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव राज्यसभेत पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींकडून कलम 370 हटवण्याच्या शिफारशीला मान्यता देण्यात आली. जम्मू काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी केंद्र सरकारकडून आधीच खबरदारी घेण्यात आली होती. अतिरिक्त जवानांचा फौजफाटा काश्मीरमध्ये पाठविण्यात आला होता. तर राज्यभरात कलम 144 लागू करण्यात आलं होतं. सुरक्षेची पुरती काळजी घेतल्यानंतर केंद्र सरकारकडून संसदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. 

या प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं की, जेव्हा मी जम्मू-काश्मीर राज्य असा उल्लेख करतो, त्यात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनही येतं. काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा संसदेला अधिकार आहे. त्यासाठी कुणाचीही संमती घ्यायची गरज नाही. संसद हे सर्वोच्च सभागृह आहे, असंही अमित शाह म्हणाले होते. तसेच पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान