शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जम्मू काश्मीरच्या विभाजनाला अवैध ठरवणाऱ्या चीनला भारताने सुनावले खडेबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 20:08 IST

कलम 370 रद्द करून जम्म काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे  केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.

नवी दिल्ली  - कलम 370 रद्द करून जम्म काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे  केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या विभाजनाच्या प्रश्नावर चीनने नाक खूपसत हे विभाजन अवैध आणि निरर्थक असल्याचा म्हटले होते. त्यानंतर भारतानेहीचीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अभिन्न भाग आहेत. त्यामुळे या भागांविषयी बोलताना बाहेरील देशांनी काळजी घेतली पाहिजे, असा टोला भारताने चीनला लगावला आहे. भारताने जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर चीनने आक्षेप घेतला होता. जम्मू-काश्मीरचे विभाजन हे अवैध आणि निरर्थक आहे. भारताने चीनच्या काही भागाला आपल्या प्रशासकीय अधिकार क्ष्रेत्रात सामील करून घेतले आहे. ही बाब म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान आहे, असे चीनने म्हटले होते. दरम्यान,  भारताने चीनच्या आक्षेपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अभिन्न भाग आहेत. त्यामुळे या भागांविषयी बोलताना बाहेरील देशांनी काळजी घ्यावी, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिला आहे. युरोपीयन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाने नुकत्याच केलेल्या काश्मीर दौऱ्यावरही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टीका केली होती. त्यालाही परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील लोकांना निमंत्रित करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाला अधिकार आहे. अनेकदा अशी मंडळी खासगी दौऱ्यावर येतात. काही वेळा राष्ट्रहीत विचारात घेऊन आम्ही त्यांना अधिकृतरीत्या औपचारिक दौऱ्याशी जोडून घेतो. युरोपीयन युनियनच्या प्रतिनिधींनी भारताला ओळखून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यात विविध विचारसरणीचे लोक होते. आम्ही त्यांना काश्मीरमध्ये जाण्यास पाठिंबाद दिला,'' असे रविश कुमार यांनी सांगितले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतchinaचीन