शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

जम्मू काश्मीरच्या विभाजनाला अवैध ठरवणाऱ्या चीनला भारताने सुनावले खडेबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 20:08 IST

कलम 370 रद्द करून जम्म काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे  केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.

नवी दिल्ली  - कलम 370 रद्द करून जम्म काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे  केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या विभाजनाच्या प्रश्नावर चीनने नाक खूपसत हे विभाजन अवैध आणि निरर्थक असल्याचा म्हटले होते. त्यानंतर भारतानेहीचीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अभिन्न भाग आहेत. त्यामुळे या भागांविषयी बोलताना बाहेरील देशांनी काळजी घेतली पाहिजे, असा टोला भारताने चीनला लगावला आहे. भारताने जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर चीनने आक्षेप घेतला होता. जम्मू-काश्मीरचे विभाजन हे अवैध आणि निरर्थक आहे. भारताने चीनच्या काही भागाला आपल्या प्रशासकीय अधिकार क्ष्रेत्रात सामील करून घेतले आहे. ही बाब म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान आहे, असे चीनने म्हटले होते. दरम्यान,  भारताने चीनच्या आक्षेपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अभिन्न भाग आहेत. त्यामुळे या भागांविषयी बोलताना बाहेरील देशांनी काळजी घ्यावी, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिला आहे. युरोपीयन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाने नुकत्याच केलेल्या काश्मीर दौऱ्यावरही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टीका केली होती. त्यालाही परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील लोकांना निमंत्रित करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाला अधिकार आहे. अनेकदा अशी मंडळी खासगी दौऱ्यावर येतात. काही वेळा राष्ट्रहीत विचारात घेऊन आम्ही त्यांना अधिकृतरीत्या औपचारिक दौऱ्याशी जोडून घेतो. युरोपीयन युनियनच्या प्रतिनिधींनी भारताला ओळखून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यात विविध विचारसरणीचे लोक होते. आम्ही त्यांना काश्मीरमध्ये जाण्यास पाठिंबाद दिला,'' असे रविश कुमार यांनी सांगितले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतchinaचीन