शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"आम्हाला कोणती खुर्ची नको, भाजपची राजवट घालवायचीय", 'बेटी बचाओ'वरून ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 15:06 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही सहभाग आहे. पण विरोधकांच्या आघाडीचा चेहरा कोण असेल या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधकांना डिवचत आहेत. अशातच मणिपूरमधील हिंसाचारची क्रूरता, महिलांवरील अत्याचार आणि जाळपोळ यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला घेरले आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत टीकास्त्र सोडले. 

मणिपूर हिंसाचारावरून ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींचे नाव न घेता ममता म्हणाल्या, "भाजपाने 'बेटी बचाओ'चा नारा दिला होता, आता तो नारा कुठे आहे? आज मणिपूर जळत आहे. तसेच बिल्किस बानो प्रकरणात आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. ब्रिजभूषण सिंह यांना देखील कुस्ती प्रकरणात जामीन मिळाला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत देशातील महिला तुम्हाला देशाच्या राजकारणातून फेकून देतील", असा घणाघात त्यांनी केला. 

ममता बॅनर्जींचं टीकास्त्र दरम्यान, आम्हाला कोणत्याही खुर्चीचा मोह नसून भाजपाची ही राजवट घालवायची आहे, असेही ममता  बॅनर्जींनी म्हटले. "भाजपाने पश्चिम बंगालमध्ये अनेक केंद्रीय पथके पाठवली, पण मणिपूरला केंद्रीय पथक का पाठवले नाही? मला पंतप्रधान मोदींना विचारायचे आहे की, मणिपूरमधील घटनेने तुम्ही थोडे देखील दुखावला नाहीत का? तुम्ही पश्चिम बंगालकडे नेहमी बोट दाखवता पण तुम्हाला माता बहिणींवर प्रेम नाही का? कधीपर्यंत अशा मुली जळणार, दलित, अल्पसंख्याक मारले जाणार, शेकडो माणसं मारली जाणार? आम्ही मणिपूरकडे दुर्लक्ष करणार नाही कारण ईशान्येकडील बहिणी आमच्या बहिणी आहेत", अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीManipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीWomenमहिलाBJPभाजपा