शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

"आम्ही भीक मागितली नाही..."; INDIA आघाडीत जागावाटपावरुन काँग्रेस ममतांवर भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:13 IST

तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला केवळ दोन लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात भाजपाचा पराभव करण्यासाठी २८ पक्षांची इंडिया आघाडीही रणनीती आखत आहे. परंतु इंडिया आघाडीता जागावाटपावरून समन्वयापूर्वीच वादाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी थेट टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जींना युती नको आहे, त्या मोदींची सेवा करण्यात मग्न आहेत अशी टीका त्यांनी केली. 

तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला केवळ दोन लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे. सूत्रांनुसार, २०१९ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीला राज्यात ४३ टक्के मते मिळाली होती आणि २२ जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत तृणमूल बंगालमध्ये प्रबळ पक्ष असून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना मिळावा अशी पक्षाची इच्छा आहे. एका इंग्रजी चॅनेलनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. 

गुरुवारी काँग्रेसने टीएमसीच्या या फॉर्म्युल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले, ममता यांच्याकडे कोणी भीक मागितली हे मला माहीत नाही. आम्ही कशाची भीक मागत नाही. युती हवी असं ममता स्वत: सांगतायेत. पण आम्हाला ममतांच्या आधाराची गरज नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असं त्यांनी स्पष्ट सुनावले. त्याचसोबत ममता बॅनर्जी यांना आघाडी नको. त्या तर मोदींची सेवा करण्यात मग्न आहेत असंही चौधरींनी म्हटलं. 

दरम्यान, जागावाटपाचा एक स्पष्ट फॉर्म्युला निश्चित आहे. ज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाईल. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सर्व ४२ जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील केवळ २ जागाच काँग्रेसला जिंकता आल्या. देशातील सर्वात जुन्या पक्षाला पश्चिम बंगालमध्ये केवळ ५.६७ टक्के मते मिळाली. जी सीपीआयपेक्षाही कमी आहेत. सीपीआय(M) ला राज्यात ६.३३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे इंडिया आघाडीत जागावाटपावरून येत्या काळात रस्सीखेच लागल्याचे दिसून येईल.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल