शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

खासगीकरण न झाल्यास एअर इंडिया बंद करावी लागेल; सरकारची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 21:03 IST

एअर इंडियावर तब्बल ६० हजार कोटींचं कर्ज; कंपनी डबघाईला

नवी दिल्ली: विमान दुरुस्ती विधेयकाला (Aircraft Amendment Bill 2020) राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मार्चमध्येच विधेयक संमत केलं होतं. आता राज्यसभेत विधेयक पारित झाल्यानं त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्यास जबर दंड आकारण्याची तरतूद विधेयकात आहे. या विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा झाली. त्यावेळी नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरींनी विधेयकातल्या तरतुदींबद्दल महत्त्वाची माहिती दिली.हरदीप सिंग पुरींनी कर्जाच्या ओझ्यामुळे डबघाईला आलेल्या एअर इंडियाबद्दलही भाष्य केलं. 'एअर इंडियाची सध्याची स्थिती पाहता केवळ दोनच पर्याय सरकारकडे आहेत. एक तर केंद्र सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करेल किंवा ही कंपनीच बंद करेल. सध्याच्या घडीला सरकारकडे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत,' असं पुरी म्हणाले. एअर इंडियावर असलेल्या कर्जाचा आकडा पाहता सरकार कंपनीला कोणतीही मदत करू शकत नाही. एअर इंडिया सुरू ठेवण्यासाठी कंपनीचं खासगीकरण करावं लागेल. तसं न झाल्यास नाईलाजास्तव सरकारला कंपनी बंद करावी लागेल, असं पुरींनी संसदेला सांगितलं.एअर इंडियावर ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यामुळे आमच्याकडे अतिशय मोजके पर्याय शिल्लक आहेत. एअर इंडियाचं खासगीकरण होईल. त्याला नवा मालक मिळेल आणि कंपनी पुन्हा एकदा भरारी घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील विमानतळांचं खासगीकरण म्हणजे हवाई वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मक्तेदारी निर्माण करण्याचा डाव असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. या टीकेला पुरी यांनी उत्तर दिलं. देशातील एकूण हवाई वाहतुकीचा विचार केल्यास, मुंबई आणि दिल्लीचा वाटा ३३ टक्के इतका आहे. तर अदानी समूहाच्या ताब्यात गेलेल्या ६ विमानतळांचा वाटा केवळ ९ टक्के आहे, अशी आकडेवारी पुरी यांनी सांगितली. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया