शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

Jammu and Kashmir: आम्हाला जनावरांसारखं वागवलं जातंय; मेहबूबा यांच्या मुलीचं अमित शहांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 12:29 IST

मी जर मीडियाशी बोलली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही सरकारने ताब्यात घेतलं आहे. याचदरम्यान मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. इल्तिजा जावेदने या संदेशात म्हटलं आहे की, आई मेहबूबा यांना अटक केल्यानंतर काही दिवसांत आम्हाला घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. 

इल्तिजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. त्या मीडियाशी बोलण्यावरुन धमकविण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. इल्तिजाने सांगितले की, अनेक काश्मिरींना जनावरासारखं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हे मानवाधिकाराचं उल्लंघन आहे. मी जर मीडियाशी बोलली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. 

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरेन्सचे उमर अब्दुला यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 4 ऑगस्टला रात्री उशीरा त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

गेल्या सोमवारी (5 ऑगस्टला) मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे. 

तर भाजपाने आपल्या ताकदीच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोप सुद्धा पी. चिदंबरम यांनी केला आहे. जम्मू-काश्मीर सध्या अस्थिर आहे आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था त्याबाबत वृत्तांकन करत आहेत. परंतू, भारतातील प्रसारमाध्यमे जम्मू-काश्मीरमधील वृत्तांकन करताना दिसत नाहीत. भाजपा असा दावा करत आहे की, काश्मीरमधील परिस्थिती निवळली आहे. जर भारतीय प्रसारमाध्यमे काश्मीरमधील अस्थिरतेचे वृत्तांकन करत नसतील तर याचा अर्थ तेथील परिस्थिती स्थिर आहे असा होतो का? असा सवालही पी. चिदंबरम यांनी केला होता.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शहाArticle 370कलम 370Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती