शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रशियानं भारताला दिली पुन्हा मोठी ऑफर; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर पुतिन मदतीला सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 16:24 IST

अमेरिकेच्या दबावामुळे भारत-रशियाच्या संबंधावर परिणाम होईल का? या पत्रकाराच्या प्रश्नावर रशियाने हे उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली – गेल्या १ महिन्यापासून बलाढ्य रशिया आणि यूक्रेन(Russia Ukraine War) यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले. संयुक्त राष्ट्र परिषदेत रशियाविरोधात मतदान घेण्यात आले. या सर्व परिस्थितीत भारताने तटस्थ भूमिका घेत अप्रत्यक्षपणे रशियाला न दुखावण्याची भूमिका घेतली. परंतु भारताने रशियाच्या विरोधात बोलावं यासाठी सातत्याने अमेरिकेकडून दबाव टाकण्यात येत आहे.

त्यातच आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटलंय की, आम्ही भारताला कुठल्याही प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यास तयार आहोत. भारताला जे आमच्याकडून खरेदी करायचे असेल ते आम्ही देऊ. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. रशिया आणि भारतात(India-Russia) खूप चांगले संबंध आहेत. भारत-रशियाच्या भागीदारीवर कुठल्याही दबावाचा काही परिणाम होईल अशी शंकाही माझ्या मनात नाही. दुसऱ्यांनी त्यांच्या धोरणांवर काम करण्यासाठी मजबूर केले जात आहे असं सांगत त्यांनी अमेरिकेवर नाव न न घेता टीका केली. अमेरिकेच्या दबावामुळे भारत-रशियाच्या संबंधावर परिणाम होईल का? या पत्रकाराच्या प्रश्नावर रशियाने हे उत्तर दिले आहे.

यूक्रेनमध्ये युद्ध नव्हे तर विशेष ऑपरेशन

यूक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याचं म्हटलं जाते ते खरं नाही. याठिकाणी एक विशेष ऑपरेशन सुरू आहे. लष्कराकडून पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे. रशियाला कोणताही धोका निर्माण करण्याची क्षमता निर्माण करण्यापासून कीव्ह राजवटीला वंचित ठेवण्याचा आमचं उद्देश आहे. सुरक्षा आव्हानांच्या संदर्भात ते भारताला कसे समर्थन देऊ शकतात? लावरोव यांनी उत्तर दिले की, चर्चा हे भारतासोबत अनेक दशकांपासून विकसित झालेल्या संबंधांचे वैशिष्ट्य आहे. नातेसंबंध म्हणजे धोरणात्मक भागीदारी. याच आधारावर आम्ही सर्व क्षेत्रांतील सहकार्याला चालना देत आहोत.

रशियन परराष्ट्र मंत्री म्हणाले की, भारतीय परराष्ट्र धोरणे स्वातंत्र्य आणि वास्तविक राष्ट्रीय कायदेशीर हितांवर लक्ष केंद्रित करतात. तेच समान धोरण रशियन फेडरेशनमध्ये आधारित आहे आणि त्यामुळे आम्हाला मोठे देश, चांगले मित्र आणि एकनिष्ठ भागीदार बनवतात असा मला विश्वास आहे. शुक्रवारी सकाळी सर्गेई लावरोव यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यानंतर ते पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत.

अमेरिकेचा भारताला इशारा

चीनने जर एलएसीवर हल्ला केला, भारतात घुसला तर रशिया आपल्याला मदत करेल या अपेक्षेवर भारताने राहू नये, असे अमेरिकेने म्हटले आहे. रशियावर निर्बंध लादण्याची आणि ते कार्यरत करण्याची जबाबदारी अमेरिकेने दलीप सिंह यांच्यावर दिली आहे. रशियावरील निर्बंध न पाळणाऱ्या देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असं अमेरिकेने इशारा दिला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाIndiaभारत