शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रशियानं भारताला दिली पुन्हा मोठी ऑफर; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर पुतिन मदतीला सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 16:24 IST

अमेरिकेच्या दबावामुळे भारत-रशियाच्या संबंधावर परिणाम होईल का? या पत्रकाराच्या प्रश्नावर रशियाने हे उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली – गेल्या १ महिन्यापासून बलाढ्य रशिया आणि यूक्रेन(Russia Ukraine War) यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले. संयुक्त राष्ट्र परिषदेत रशियाविरोधात मतदान घेण्यात आले. या सर्व परिस्थितीत भारताने तटस्थ भूमिका घेत अप्रत्यक्षपणे रशियाला न दुखावण्याची भूमिका घेतली. परंतु भारताने रशियाच्या विरोधात बोलावं यासाठी सातत्याने अमेरिकेकडून दबाव टाकण्यात येत आहे.

त्यातच आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटलंय की, आम्ही भारताला कुठल्याही प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यास तयार आहोत. भारताला जे आमच्याकडून खरेदी करायचे असेल ते आम्ही देऊ. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. रशिया आणि भारतात(India-Russia) खूप चांगले संबंध आहेत. भारत-रशियाच्या भागीदारीवर कुठल्याही दबावाचा काही परिणाम होईल अशी शंकाही माझ्या मनात नाही. दुसऱ्यांनी त्यांच्या धोरणांवर काम करण्यासाठी मजबूर केले जात आहे असं सांगत त्यांनी अमेरिकेवर नाव न न घेता टीका केली. अमेरिकेच्या दबावामुळे भारत-रशियाच्या संबंधावर परिणाम होईल का? या पत्रकाराच्या प्रश्नावर रशियाने हे उत्तर दिले आहे.

यूक्रेनमध्ये युद्ध नव्हे तर विशेष ऑपरेशन

यूक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याचं म्हटलं जाते ते खरं नाही. याठिकाणी एक विशेष ऑपरेशन सुरू आहे. लष्कराकडून पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे. रशियाला कोणताही धोका निर्माण करण्याची क्षमता निर्माण करण्यापासून कीव्ह राजवटीला वंचित ठेवण्याचा आमचं उद्देश आहे. सुरक्षा आव्हानांच्या संदर्भात ते भारताला कसे समर्थन देऊ शकतात? लावरोव यांनी उत्तर दिले की, चर्चा हे भारतासोबत अनेक दशकांपासून विकसित झालेल्या संबंधांचे वैशिष्ट्य आहे. नातेसंबंध म्हणजे धोरणात्मक भागीदारी. याच आधारावर आम्ही सर्व क्षेत्रांतील सहकार्याला चालना देत आहोत.

रशियन परराष्ट्र मंत्री म्हणाले की, भारतीय परराष्ट्र धोरणे स्वातंत्र्य आणि वास्तविक राष्ट्रीय कायदेशीर हितांवर लक्ष केंद्रित करतात. तेच समान धोरण रशियन फेडरेशनमध्ये आधारित आहे आणि त्यामुळे आम्हाला मोठे देश, चांगले मित्र आणि एकनिष्ठ भागीदार बनवतात असा मला विश्वास आहे. शुक्रवारी सकाळी सर्गेई लावरोव यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यानंतर ते पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत.

अमेरिकेचा भारताला इशारा

चीनने जर एलएसीवर हल्ला केला, भारतात घुसला तर रशिया आपल्याला मदत करेल या अपेक्षेवर भारताने राहू नये, असे अमेरिकेने म्हटले आहे. रशियावर निर्बंध लादण्याची आणि ते कार्यरत करण्याची जबाबदारी अमेरिकेने दलीप सिंह यांच्यावर दिली आहे. रशियावरील निर्बंध न पाळणाऱ्या देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असं अमेरिकेने इशारा दिला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाIndiaभारत