शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही शेतकऱ्यांची मुले! मागण्या मान्य न झाल्यास पद्म, अर्जुन पुरस्कार परत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 00:36 IST

खेळाडूंचा इशारा; केंद्र सरकारला शनिवारपर्यंतची मुदत

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या ५ डिसेंबरपर्यंत मान्य केल्या नाहीत तर अर्जुन व पद्म पुरस्कार परत करण्याचा इशारा खेळाडू तसेच अन्य मान्यवरांनी केंद्र सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तारसिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजनसिंग चिमा, हॉकीपटू राजबिर कौर आदी खेळाडू आता सरसावले आहेत. 

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत तर पद्म व अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती भवनासमोर ठेवून आम्ही ते परत करू, असा इशारा दिल्याचे या खेळाडूंनी सांगितले आहे. आंदोलक शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात नव्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारण्यात आले होते, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. त्याबद्दल हरयाणा व केंद्रातील सरकारचा माजी खेळाडूंनी तीव्र निषेध केला आहे.   

आम्ही शेतकऱ्यांची मुलेबास्केटबॉलपटू साजनसिंग चिमा यांनी सांगितले की, आम्ही खेळाडू असलो तरी शेतकऱ्यांचीही मुले आहोत. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जे प्रयत्न सुरू आहेत ते आम्हाला आवडलेले नाही. शेतकऱ्यांना नवे कृषी कायदे नको असतील तर ते त्यांच्यावर लादण्याचा केंद्र सरकार का प्रयत्न करत आहे, असाही सवाल त्यांनी केला.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप