शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

आम्ही शेतकऱ्यांची मुले! मागण्या मान्य न झाल्यास पद्म, अर्जुन पुरस्कार परत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 00:36 IST

खेळाडूंचा इशारा; केंद्र सरकारला शनिवारपर्यंतची मुदत

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या ५ डिसेंबरपर्यंत मान्य केल्या नाहीत तर अर्जुन व पद्म पुरस्कार परत करण्याचा इशारा खेळाडू तसेच अन्य मान्यवरांनी केंद्र सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तारसिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजनसिंग चिमा, हॉकीपटू राजबिर कौर आदी खेळाडू आता सरसावले आहेत. 

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत तर पद्म व अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती भवनासमोर ठेवून आम्ही ते परत करू, असा इशारा दिल्याचे या खेळाडूंनी सांगितले आहे. आंदोलक शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात नव्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारण्यात आले होते, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. त्याबद्दल हरयाणा व केंद्रातील सरकारचा माजी खेळाडूंनी तीव्र निषेध केला आहे.   

आम्ही शेतकऱ्यांची मुलेबास्केटबॉलपटू साजनसिंग चिमा यांनी सांगितले की, आम्ही खेळाडू असलो तरी शेतकऱ्यांचीही मुले आहोत. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जे प्रयत्न सुरू आहेत ते आम्हाला आवडलेले नाही. शेतकऱ्यांना नवे कृषी कायदे नको असतील तर ते त्यांच्यावर लादण्याचा केंद्र सरकार का प्रयत्न करत आहे, असाही सवाल त्यांनी केला.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप