शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

आम्ही प्रादेशिक अस्मिताही जपतो; सर्वच राज्यांमध्ये भाजपची लाट, पंतप्रधान मोदी यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 06:18 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी सांगितले की, ‘देशाची प्रगती साधताना प्रादेशिक अस्मिताही जपणे आवश्यक असल्याची मला कल्पना आहे. मीही एका राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यामुळे राज्यांच्या भावना जाणून आहे.

नवी दिल्ली : ‘सर्व राज्यांमध्ये भाजपचीच लाट आहे. आम्ही सर्वत्र मोठा विजय मिळवू. पाच राज्यांतील जनता आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी नक्की देईल,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सबका साथ, सबका विकास हेच भाजपच्या कार्यशैलीचे सूत्र असल्याचेही ते म्हणाले.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी सांगितले की, ‘देशाची प्रगती साधताना प्रादेशिक अस्मिताही जपणे आवश्यक असल्याची मला कल्पना आहे. मीही एका राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यामुळे राज्यांच्या भावना जाणून आहे. भाजपच्या बाजूने नेहमीच जनता उभी राहिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका होत असलेल्या पाचही राज्यांत भाजपचाच विजय होणार आहे.’मोदी यांनी सांगितले की, ‘एखादा पक्ष पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाकडून चालविला जात असेल तर तिथे घराणेशाही निर्माण होते. जम्मू-काश्मीरमध्ये दोन पक्ष वर्षानुवर्षे असेच दोन कुटुंबांकडून चालविले जातात. हरयाणा, झारखंड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू अशा राज्यांतही हेच चित्र दिसेल. घराणेशाही हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे. संसदेत मी टीका करताना कोणाच्याही पिता किंवा आजोबांबद्दल बोललो नाही. आम्ही नेहरुंचा कधीही उल्लेख करत नाही, अशी काँग्रेस टीका करते आणि आम्ही नेहरुंचा उल्लेख केला की काँग्रेसला ते रुचत नाही.’कोणाचेही ऐकण्याची राहुल गांधींची तयारी नाहीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कोणतीही बाजू ऐकून घेण्यास तयार नसतात. अशा व्यक्तीला मी कसे उत्तर देऊ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राहुल गांधी संसदेत कामकाजाप्रसंगी काही वेळा अनुपस्थित राहातात, अशी टीकाही त्यांनी केली. दोनजणांनी गुजरातमधील नेत्यांसंदर्भात वाईट दर्जाची टीका केली होती. त्यांना उत्तर प्रदेशने धडा शिकविला, असे मोदी म्हणाले. त्यांचा रोख समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर होता.शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते नवे कृषी कायदेमोदी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच नवे कृषी कायदे आणले होते. लोकहित लक्षात घेऊनच हे कायदे केंद्र सरकारने रद्द केले. शेतकऱ्यांचे भले व्हावे यासाठीच माझ्या सरकारने नेहमी काम केले आहे. त्यामुळेच आम्हाला नेहमीच शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आला, असा दावाही मोदी यांनी केला.

पंजाबमधील घटनेबद्दल बोलण्यास नकार-  पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पंजाबमध्ये माझ्या सुरक्षेबाबत जो प्रकार झाला, ते प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. - त्यामुळे या प्रकरणाविषयी मी काहीही बोलणार नाही. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाला होती, तशी समिती नेमण्याची तयारी सरकारने दाखविली. - उत्तर प्रदेश सरकार अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम करत आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण