शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

'आम्ही 23, 24, 25, 26 जुलै रोजी चार अलर्ट जारी केले', वायनाड भूस्खलनावर शाह स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 15:54 IST

Wayanad Landslide : 'केंद्र सरकारने सात दिवस आधीच NDRF ची 9 पथके केरळला पाठवली होती. केरळ सरकारने वेळेवर काहीच उपाययोजना केल्या नाही.'

Amit Shah on Wayanad Landslide : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत सूमारे 158 लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक बेपत्ता आहेत. या घटनेचा मुद्दा बुधवारी(दि.31) राज्यसभेतही उपस्थित करण्यात आला. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. तसेच, केरळ सरकारला धारेवर धरले. शाह म्हणाले की, केंद्र सरकारने 23 जुलै रोजीच एनडीआरएफची 9 पथके केरळला पाठवली होती, पण केरळ सरकारने लोकांना स्थलांतरित करण्यासाठी काहीच केले नाही.

केरळ सरकारने वेळीच कारवाई केली नाही: अमित शाहसभागृहात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी सुरुवातीला भूस्खलनामुळे प्राण गमावलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. तसेच, या आपत्तीबाबत काही माहिती सभागृहात सांगितली. अमित शाह म्हणाले की, '23 तारखेलाच एनडीआरएफच्या 9 टीम केरळला पाठवल्या होत्या. केरळ सरकारला केंद्र सरकारने 23 जुलै रोजीच पूर्व इशारा दिला होता. केरळ सरकारला 23, 24 आणि 25 जुलै रोजीही पूर्वसूचना देण्यात आली होती. 26 जुलैला 20 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडेल, भूस्खलन होऊ शकते, चिखलही येऊ शकतो आणि काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे आम्ही आधीच सांगितले होते. केरळ सरकारने काय केले? लोकांचे स्थलांतर केले नाही. स्थलांतर केले असते, तर इतक्या लोकांचा जीव गेला नसता.'

'कोणतेही राज्य एसडीआरएफमध्ये 10 टक्के रक्कम स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करू शकते. आपत्तीच्या नावाखाली 10 टक्के खर्च केला तर कोणी विचारत नाही, पण 90 टक्के रक्कम मार्गदर्शक तत्त्वांनुसार खर्च करावी लागते. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारला 23 जुलै रोजीच संभाव्य भूस्खलनाबाबत इशारा देण्यात आला होता, पण सरकारने काहीच केले नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. केरळच्या जनतेच्या आणि तिथल्या सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची ही वेळ आहे. नरेंद्र मोदी सरकार केरळच्या लोकांसोबत आणि तिथल्या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे', असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

वायनाड भूस्खलनावर राहुल गांधी काय म्हणाले?

'वायनाडमध्ये घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. सैन्य चांगले काम करत आहे. अशा कठीण प्रसंगी वायनाडच्या लोकांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. मी सरकारला तात्काळ मदतीची विनंती करतो. वायनाडमध्ये दुस-यांदा अशी दुर्घटना घडली आहे. 5 वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. या भागात पर्यावरणीय समस्या आहे, म्हणून याकडे लक्ष दिले पाहिजे आणि जे काही हाय-टेक उपाय केले जाऊ शकतात, ते करावे', अशी मागणी वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी यावेळी केली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहKeralaकेरळlandslidesभूस्खलन