शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पंचायत राज मंत्रालय बंद होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: June 30, 2016 05:38 IST

गेल्या वर्षी बजेटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर पंचायत राज मंत्रालयाचे भविष्य अंधारात सापडले आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी बजेटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर पंचायत राज मंत्रालयाचे भविष्य अंधारात सापडले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने मागास प्रांत अनुदान निधी (बीआरजीएफ) आणि राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान (आरजीपीएसए) या दोन योजना बंद केल्यामुळे आता ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत येणारा हा विभागही लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांना वाटते.पंचायत राज मंत्री चौधरी बीरेंद्र सिंग हे ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रमुख असल्याकारणाने पंचायत राज मंत्रालयाला वाचविण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत, असे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पंचायत राज मंत्रालय बंद करण्यात आल्यानंतर कुणीही प्रश्न उपस्थित करू नये म्हणून सरकारच हे मंत्रालय हळूहळू निकामी बनवित आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. केंद्र सरकारने गेल्या वर्षी या मंत्रालयाचे बजेट ७००० कोटीवरून कमी करून ९६ कोटींवर आणले होते, हे येथे उल्लेखनीय आहे. (वृत्तसंस्था)