शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच अधिकारी लागले कामाला, १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:21 IST

आरोग्य विभागाला आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. भाजपचे नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच सर्व विभागांना १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी कामाला लागले आहेत. 

मुख्य सचिवांनी सर्व विभागांना 'विकासित दिल्ली' आणि आयुष्मान भारत सारख्या प्रलंबित केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी , गटारांमधून पाणी वाहणे किंवा पाणी साचणे या समस्यांना तोंड देण्यासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. 

मुख्य सचिवांच्या सूचनांनुसार, कृती आराखड्यात १५ दिवस, मासिक आणि १०० दिवसांच्या कालावधीत पूर्ण करावयाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. तसेच, जर कोणताही प्रकल्प किंवा योजना मंत्रिमंडळासमोर ठेवायची असेल, तर विभागाने कॅबिनेट नोटचा मसुदा तयार करण्यास सुरुवात करावी, असेही म्हटले आहे. 

आरोग्य विभागाला आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगण्यात आले आहे. या योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहेत. दरम्यान, सर्व विभाग प्रमुखांना नवीन भाजप सरकार शपथविधीनंतर सुरू करू शकणाऱ्या योजना किंवा प्रकल्पांसाठी कॅबिनेट मसुदा नोट्स तयार करण्यास सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली सरकारचा सामान्य प्रशासन विभाग (GAD) १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करेल आणि तो नवीन सरकारला सादर करणार आहे. आरोग्य विभागाला आयुष्मान भारत आरोग्य योजना लागू करण्यासाठी कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ही योजना मागील आपच्या सरकारने दिल्लीत लागू केली नव्हती. 

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर लवकरच आयुष्मान भारत आरोग्य योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विभाग प्रमुखांना केंद्र सरकारच्या इतर योजनांवर काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्या मागील सरकारने दिल्लीत लागू केल्या नव्हत्या.

याचबरोबर, पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून एमसीडी आणि एनडीएमसी सारख्या महानगरपालिका संस्था, दिल्ली जल बोर्ड आणि सिंचन आणि पूर विभाग यांच्यासह नाल्यांची योग्य स्वच्छता आणि गाळ काढण्यासाठी पावले उचलतील. तसेच, गटार ओव्हरफ्लोची समस्या रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असे मुख्य सचिवांनी सर्व संबंधित विभागांना सांगितले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा