शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच अधिकारी लागले कामाला, १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:21 IST

आरोग्य विभागाला आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. भाजपचे नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच सर्व विभागांना १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी कामाला लागले आहेत. 

मुख्य सचिवांनी सर्व विभागांना 'विकासित दिल्ली' आणि आयुष्मान भारत सारख्या प्रलंबित केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी , गटारांमधून पाणी वाहणे किंवा पाणी साचणे या समस्यांना तोंड देण्यासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. 

मुख्य सचिवांच्या सूचनांनुसार, कृती आराखड्यात १५ दिवस, मासिक आणि १०० दिवसांच्या कालावधीत पूर्ण करावयाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. तसेच, जर कोणताही प्रकल्प किंवा योजना मंत्रिमंडळासमोर ठेवायची असेल, तर विभागाने कॅबिनेट नोटचा मसुदा तयार करण्यास सुरुवात करावी, असेही म्हटले आहे. 

आरोग्य विभागाला आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगण्यात आले आहे. या योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहेत. दरम्यान, सर्व विभाग प्रमुखांना नवीन भाजप सरकार शपथविधीनंतर सुरू करू शकणाऱ्या योजना किंवा प्रकल्पांसाठी कॅबिनेट मसुदा नोट्स तयार करण्यास सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली सरकारचा सामान्य प्रशासन विभाग (GAD) १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करेल आणि तो नवीन सरकारला सादर करणार आहे. आरोग्य विभागाला आयुष्मान भारत आरोग्य योजना लागू करण्यासाठी कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ही योजना मागील आपच्या सरकारने दिल्लीत लागू केली नव्हती. 

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर लवकरच आयुष्मान भारत आरोग्य योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विभाग प्रमुखांना केंद्र सरकारच्या इतर योजनांवर काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्या मागील सरकारने दिल्लीत लागू केल्या नव्हत्या.

याचबरोबर, पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून एमसीडी आणि एनडीएमसी सारख्या महानगरपालिका संस्था, दिल्ली जल बोर्ड आणि सिंचन आणि पूर विभाग यांच्यासह नाल्यांची योग्य स्वच्छता आणि गाळ काढण्यासाठी पावले उचलतील. तसेच, गटार ओव्हरफ्लोची समस्या रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असे मुख्य सचिवांनी सर्व संबंधित विभागांना सांगितले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा