शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

२३ लाखांचा खर्च मात्र थेंबभर पाणी नाही ग्रा.पं.व समितीचा वाद : आठ वर्षांपासून शिरसोलीची पाणी योजना रखडली

By admin | Updated: February 17, 2016 00:23 IST

शिरसोली : जळगाव शहराजवळ असल्याने झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट लक्षात घेता शासनाने शिरसोली प्र.न.या गावासाठी ७५ लाखांची भारत निर्माण योजना मंजूर केली. २३ लाख खर्च करून काही काम झाले. मात्र गेल्या आठ वर्षांपासून ग्रामपंचायत व समितीच्या पदाधिकार्‍यांमधील वादामुळे गावाला एक थेंबभर पाणी मिळालेले नाही.

शिरसोली : जळगाव शहराजवळ असल्याने झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट लक्षात घेता शासनाने शिरसोली प्र.न.या गावासाठी ७५ लाखांची भारत निर्माण योजना मंजूर केली. २३ लाख खर्च करून काही काम झाले. मात्र गेल्या आठ वर्षांपासून ग्रामपंचायत व समितीच्या पदाधिकार्‍यांमधील वादामुळे गावाला एक थेंबभर पाणी मिळालेले नाही.
शिरसोलीत १५ दिवसाआड पाणी
२५ ते ३० हजार लोकसंख्या असलेल्या शिरसोली गावासाठी दापोरा बंधार्‍यावरून सामूहिक पाणी योजना सुरू आहे. सध्या गिरणा नदीत पाणी नाही. तसेच बहुळाचे पाणी फक्त दहिगाव बंधार्‍यापर्यंत आल्याने शिरसोलीच्या पाणी योजनेचा जलस्त्रोत आटला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शिरसोली प्र.न.गावाला १२ ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. फेब्रुवारी महिन्यात अशी स्थिती तर एप्रिल व मे महिन्यात काय या विचाराने शिरसोलीकरांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण होत आहे.

२००७ मध्ये पाणी योजना मंजूर
जिल्हा परिषदेतर्फे २००७ मध्ये भारत निर्माण योजना शिरसोली प्र.न.या गावासाठी मंजूर केली होती. या योजनेंतर्गत ७५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. तसेच १९ लाखांपर्यंतची रक्कम समितीच्या खात्यावरदेखील वर्ग झाली होती. त्यानुसार समितीने सुरुवातीच्या पाच सहा महिन्यात विहीर, दोन किलो मीटरपर्यंत पाईप लाईनचे काम केले आहे. त्यानंतर या योजनेचे काम रखडले ते आजपर्यत पूर्ण झाले नाही. या योजनेवर तब्बल २३ लाख रुपये खर्च करून एक थेंबभर पाणी ग्रामस्थांना मिळालेले नाही.
ग्रा.पंचायत व समितीच्या वादात शिरसोलीकर तहानलेले
पाणी योजना मंजूर झाली तेव्हापासून वादात आहे. गिरणा नदी पात्रात पाण्याचा चांगला स्त्रोत असताना या योजनेसाठी नेहरे शिवाराची निवड करण्यात आली. त्यानंतर विहिरीचे खोदकाम केल्यानंतर अत्यल्प पाणी लागले. या दरम्यान शिरसोली प्र.न.ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. दरम्यानच्या काळात समितीच्या पदाधिकार्‍यांनी झालेल्या कामासाठी निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करीत काम थांबविले. ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर आलेल्या सदस्यांनी काम करायचे नसल्यास समितीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. ग्रामपंचायत पदाधिकारी व समितीच्या पदाधिकार्‍यांमधील अंतर्गत वादामुळे तब्बल आठ वर्षांपासून ही योजना पडून आहे. आता समितीचे पदाधिकारी कामाची रक्कम वाढल्याचे कारण सांगत टाळाटाळ करीत असल्याची स्थिती आहे.