शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२३ लाखांचा खर्च मात्र थेंबभर पाणी नाही ग्रा.पं.व समितीचा वाद : आठ वर्षांपासून शिरसोलीची पाणी योजना रखडली

By admin | Updated: February 17, 2016 00:23 IST

शिरसोली : जळगाव शहराजवळ असल्याने झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट लक्षात घेता शासनाने शिरसोली प्र.न.या गावासाठी ७५ लाखांची भारत निर्माण योजना मंजूर केली. २३ लाख खर्च करून काही काम झाले. मात्र गेल्या आठ वर्षांपासून ग्रामपंचायत व समितीच्या पदाधिकार्‍यांमधील वादामुळे गावाला एक थेंबभर पाणी मिळालेले नाही.

शिरसोली : जळगाव शहराजवळ असल्याने झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट लक्षात घेता शासनाने शिरसोली प्र.न.या गावासाठी ७५ लाखांची भारत निर्माण योजना मंजूर केली. २३ लाख खर्च करून काही काम झाले. मात्र गेल्या आठ वर्षांपासून ग्रामपंचायत व समितीच्या पदाधिकार्‍यांमधील वादामुळे गावाला एक थेंबभर पाणी मिळालेले नाही.
शिरसोलीत १५ दिवसाआड पाणी
२५ ते ३० हजार लोकसंख्या असलेल्या शिरसोली गावासाठी दापोरा बंधार्‍यावरून सामूहिक पाणी योजना सुरू आहे. सध्या गिरणा नदीत पाणी नाही. तसेच बहुळाचे पाणी फक्त दहिगाव बंधार्‍यापर्यंत आल्याने शिरसोलीच्या पाणी योजनेचा जलस्त्रोत आटला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शिरसोली प्र.न.गावाला १२ ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. फेब्रुवारी महिन्यात अशी स्थिती तर एप्रिल व मे महिन्यात काय या विचाराने शिरसोलीकरांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण होत आहे.

२००७ मध्ये पाणी योजना मंजूर
जिल्हा परिषदेतर्फे २००७ मध्ये भारत निर्माण योजना शिरसोली प्र.न.या गावासाठी मंजूर केली होती. या योजनेंतर्गत ७५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. तसेच १९ लाखांपर्यंतची रक्कम समितीच्या खात्यावरदेखील वर्ग झाली होती. त्यानुसार समितीने सुरुवातीच्या पाच सहा महिन्यात विहीर, दोन किलो मीटरपर्यंत पाईप लाईनचे काम केले आहे. त्यानंतर या योजनेचे काम रखडले ते आजपर्यत पूर्ण झाले नाही. या योजनेवर तब्बल २३ लाख रुपये खर्च करून एक थेंबभर पाणी ग्रामस्थांना मिळालेले नाही.
ग्रा.पंचायत व समितीच्या वादात शिरसोलीकर तहानलेले
पाणी योजना मंजूर झाली तेव्हापासून वादात आहे. गिरणा नदी पात्रात पाण्याचा चांगला स्त्रोत असताना या योजनेसाठी नेहरे शिवाराची निवड करण्यात आली. त्यानंतर विहिरीचे खोदकाम केल्यानंतर अत्यल्प पाणी लागले. या दरम्यान शिरसोली प्र.न.ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. दरम्यानच्या काळात समितीच्या पदाधिकार्‍यांनी झालेल्या कामासाठी निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करीत काम थांबविले. ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर आलेल्या सदस्यांनी काम करायचे नसल्यास समितीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. ग्रामपंचायत पदाधिकारी व समितीच्या पदाधिकार्‍यांमधील अंतर्गत वादामुळे तब्बल आठ वर्षांपासून ही योजना पडून आहे. आता समितीचे पदाधिकारी कामाची रक्कम वाढल्याचे कारण सांगत टाळाटाळ करीत असल्याची स्थिती आहे.