शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बापरे! पुरानंतर पिण्याच्या पाण्याचं संकट? दिल्लीकरांची वाढली चिंता, 3 मोठे वॉटर प्लान्ट बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:37 IST

Delhi Water Crisis: दिल्लीमध्ये रस्त्यांवर फक्त पाणीच पाणी आहे. हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. यातच दिल्लीत पाण्याचे संकट निर्माण होणार आहे.

दिल्लीतील नागरिकांची चिंता आता आणखी वाढली आहे. पुरामुळे बाधित लोकांना आता पाणीटंचाईला देखील सामोरे जावे लागू शकते. तीन मोठे वॉटर प्लान्ट बंद पडले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती देताच दिल्लीकरांचं टेन्शन वाढलं आहे. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये रस्त्यांवर फक्त पाणीच पाणी आहे. हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. यातच दिल्लीत पाण्याचे संकट निर्माण होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतील काही भागात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यमुनेचे पाणी कमी होताच आम्ही ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. जलसंकटामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. 

दिल्लीच्या पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात रस्त्यावर पाणी आले. मेट्रो आणि बससेवेवर देखील परिणाम झाला आहे. मेट्रो धीम्या गतीने धावत होती. स्मशानभूमी बंद करावी लागली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पूरग्रस्त भागातील शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. आता दिल्लीत राहणाऱ्या लोकांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. 

वजीराबाद आणि चंद्रावल प्लान्ट बंद झाल्यामुळे जवळपास 40 लाख लोक प्रभावित होऊ शकतात. हे लोक मुख्यतः मध्य आणि जुन्या दिल्लीतील आहेत. हे प्लान्ट बंद पडल्याने इंद्रलोक, शास्त्रीनगर, आझाद मार्केट, न्यू रोहतक रोड, बापा नगर, देव नगर, मॉडेल बस्ती, झंडेवालान एक्स्टेंशन, जामा मशीद, चांदणी चौक, दर्यागंज या भागात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचं समजतं. काही रुग्णालयांनाही याचा फटका बसू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीfloodपूर