शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

बापरे! पुरानंतर पिण्याच्या पाण्याचं संकट? दिल्लीकरांची वाढली चिंता, 3 मोठे वॉटर प्लान्ट बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:37 IST

Delhi Water Crisis: दिल्लीमध्ये रस्त्यांवर फक्त पाणीच पाणी आहे. हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. यातच दिल्लीत पाण्याचे संकट निर्माण होणार आहे.

दिल्लीतील नागरिकांची चिंता आता आणखी वाढली आहे. पुरामुळे बाधित लोकांना आता पाणीटंचाईला देखील सामोरे जावे लागू शकते. तीन मोठे वॉटर प्लान्ट बंद पडले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती देताच दिल्लीकरांचं टेन्शन वाढलं आहे. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये रस्त्यांवर फक्त पाणीच पाणी आहे. हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. यातच दिल्लीत पाण्याचे संकट निर्माण होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतील काही भागात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यमुनेचे पाणी कमी होताच आम्ही ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. जलसंकटामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. 

दिल्लीच्या पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात रस्त्यावर पाणी आले. मेट्रो आणि बससेवेवर देखील परिणाम झाला आहे. मेट्रो धीम्या गतीने धावत होती. स्मशानभूमी बंद करावी लागली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पूरग्रस्त भागातील शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. आता दिल्लीत राहणाऱ्या लोकांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. 

वजीराबाद आणि चंद्रावल प्लान्ट बंद झाल्यामुळे जवळपास 40 लाख लोक प्रभावित होऊ शकतात. हे लोक मुख्यतः मध्य आणि जुन्या दिल्लीतील आहेत. हे प्लान्ट बंद पडल्याने इंद्रलोक, शास्त्रीनगर, आझाद मार्केट, न्यू रोहतक रोड, बापा नगर, देव नगर, मॉडेल बस्ती, झंडेवालान एक्स्टेंशन, जामा मशीद, चांदणी चौक, दर्यागंज या भागात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचं समजतं. काही रुग्णालयांनाही याचा फटका बसू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीfloodपूर