शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Wasim Rizvi: “माझं पार्थिव दफन करू नका, हिंदू पद्धतीने अग्नी देऊन अंत्यसंस्कार करा”; वसीम रिझवींचे मृत्यूपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 20:42 IST

उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी वसीम रिझवी यांचे मृत्यूपत्र समोर आले असून, यामध्ये रिझवी यांनी मृत्यूनंतर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करावेत, असे म्हटले आहे. तसेच अग्नी देण्याचा अधिकार कोणाला असावा, याबाबतही रिझवी यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. 

वसीम रिझवी यांनी आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्याला दफनभूमीमध्ये दफन न करता स्मशानामध्ये अग्नी देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करावेत. आपल्या पार्थिवाला अग्नी देण्याचे अधिकार महंत नरसिम्हा नंद सरस्वती यांना देत आहे, असे रिझवी यांनी आपल्या मृत्यूपत्रात म्हटले आहे. तसेच यासंदर्भातील एक व्हिडिओही त्यांनी जारी केला आहे. 

कट्टरपंथी मला मारण्याचा कट रचत आहेत

वसीम रिझवी यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, कुराणमधील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. माझा गुन्हा हा आहे की, पैगंबर-ए-एस्लाम हजरत मोहम्मद यांच्यावर एक पुस्तक लिहिले. त्यामुळेच कट्टरपंथी मला मारण्याचा कट रचत आहेत. माझ्या पार्थिवाला दफनभूमीमध्ये जागा दिली जाणार नाही, असेही या कट्टरपंथींकडून सांगितले जात आहे, असे सांगत त्यामुळेच मृत्यूनंतर देशामध्ये शांतता कायम रहावी, यासाठी मृत्यूपत्र लिहून प्रशासनाला पाठवत आहे. माझ्या मरणानंतर माझ्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावेत, असे वसीम रिझवी यांनी म्हटले आहे. 

माझ्या चितेला नरसिम्हा नंद सरस्वती यांनी द्यावा

माझ्या मृत्यूनंतर शांतता कायम रहावी, म्हणून मृत्यूपत्र लिहिले असून, मृत्यूनंतर माझे पार्थिव लखनऊमधील माझ्या हिंदू मित्रांच्या स्वाधीन करावे आणि त्यानंतर चिता रचून त्यावर अंत्यसंस्कार करावेत. माझ्या चितेला नरसिम्हा नंद सरस्वती यांनी द्यावा, असेही रिझवी यांनी म्हटले आहे. दरम्यान,  रिझवी यांचे वादग्रस्त पुस्तक समोर आल्यापासून मुस्लीम समाजाकडून जोरदार विरोध केला जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश