शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

योद्धा शहीद! 100 हून अधिक कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार; अ‍ॅम्बुलन्स चालकाचे निधन

By हेमंत बावकर | Updated: October 11, 2020 12:03 IST

Corona warrier : गेल्या 25 वर्षांपासून शहीद भगत सिंह सेवा दलामध्ये सक्रीय होते, असे सांगितले जात आहे. तसेच ते मोफत रुग्णवाहिका सेवा देत होते.

ठळक मुद्दे200 हून अधिक कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविले होते. आरिफ यांच्या निधनावर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे.मुस्लिम असूनही आरिफ यांनी 100 हून अधिक हिंदू रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

कोरोना व्हायरसच्या दहशतीमध्ये रस्त्यावर चक्कर येऊन किंवा अपघातात जखमी झालेल्यांना कोणी हातही लावण्यास धजावत नव्हते, अशा काळात कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या अॅम्बुलन्स चालकाचा कोरोनानेच घात केला आहे. दिल्लीच्या सीलमपूर भागात राहणाऱ्या आरिफ खान यांचे निधन झाले आहे. 

अॅम्बुलन्स चालक आरिफ यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून 200 हून अधिक कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविले होते. तसेच 100 हून अधिक कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी पोहोचविले होते. कोरोनाने या कोरोना योद्ध्याचा बळी घेतला आहे. आरिफ यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर हिंदूराव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 

आरिफ यांच्या निधनावर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. आरिफ हे गेल्या 25 वर्षांपासून शहीद भगत सिंह सेवा दलामध्ये सक्रीय होते, असे सांगितले जात आहे. तसेच ते मोफत रुग्णवाहिका सेवा देत होते. 21 मार्चपासून ते कोरोना लढ्यामध्ये रुग्णांना हॉस्पिटलला नेणे, आयसोलेशन सेंटरला पोहोचविणे आदी सेवा देत होते. शहीद भगत सिंह सेवा दलाचे संस्थापक जितेंद्र सिंह शंटी यांनी आरिफ यांच्या निधनावर दुख: व्य़क्त केले. मुस्लिम असूनही आरिफ यांनी 100 हून अधिक हिंदू रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले. 

जेव्हा आरिफ यांचा मृत्यू झाला तेव्हा अंत्य संस्कारासाठी त्याचे कुटुंबीय जवळ नव्हते. त्याच्या कुटुंबाने काही मिनिटांसाठी त्यांचा मृतदेह दूरूनच पाहिला. मी आरिफवर अंत्यसंस्कार केले, असे शंटी यांनी सांगितले. 3 ऑक्टोबरला आरिफ यांची तब्येत खालावली होती. तेव्हा देखील ते एका कोरोना संक्रमिताला घेऊन हॉस्पिटलला जात होते. कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. शुक्रवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या कोरोना वॉरिअरच्या कुटुंबाला सरकारने 1 कोटी रुपये मदत द्यावी अशी मागणी शंटी यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू