शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सीमेवर युद्धसज्जता, सामर्थ्य वाढविणार! लष्कर आखतेय नवी योजना; अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 07:01 IST

Indian Army: भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. 

नवी दिल्ली - भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. 

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय लष्कराकडे असलेली साधनसामग्री, मनुष्यबळ, आदी गोष्टींचा विचार करून एक नवीन धोरण आखण्यात येणार आहे. युद्धसामर्थ्य वाढविण्याबरोबरच संसाधनदृष्ट्या भारतीय लष्कर अधिक सक्षम करण्याकरिता पावले उचलली जातील.

लष्कराला लागणाऱ्या संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीबाबत भारत आत्मनिर्भर होणे अतिशय आवश्यक आहे. लष्कराकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असण्याबरोबरच संरक्षणविषयक अन्य सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

‘लष्कराने दहशतवादाचा केला कठोर मुकाबला’- देशाच्या सीमांचे रक्षण व दहशतवादाचा मुकाबला लष्कराने समर्थपणे केला आहे असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत म्हणाले.- सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख मनोज पांडे, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांचीही भाषणे यावेळी झाली. 

सरकारशिवाय निधी उभारणारकेंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त आणखी निधी उभारण्याकरिता काय पर्याय अमलात आणता येतील याचा लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत विचार करण्यात आला. 

लष्करावर गाढ विश्वाससीमाभागात पायाभूत सुविधांचा होणारा विकास तसेच या भागात संरक्षणदृष्ट्या उचलण्यात आलेली पावले यांच्यात समन्वय साधला जाणार आहे.सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दर दोन वर्षांनी अशी बैठक आयोजिण्यात येते. यंदाची बैठक मंगळवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.देशातील ज्या यंत्रणांवर जनतेचा गाढ विश्वास आहे, त्यामध्ये लष्कराचा समावेश होतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या बैठकीत सांगितले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभाग