शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर युद्धसज्जता, सामर्थ्य वाढविणार! लष्कर आखतेय नवी योजना; अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 07:01 IST

Indian Army: भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. 

नवी दिल्ली - भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. 

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय लष्कराकडे असलेली साधनसामग्री, मनुष्यबळ, आदी गोष्टींचा विचार करून एक नवीन धोरण आखण्यात येणार आहे. युद्धसामर्थ्य वाढविण्याबरोबरच संसाधनदृष्ट्या भारतीय लष्कर अधिक सक्षम करण्याकरिता पावले उचलली जातील.

लष्कराला लागणाऱ्या संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीबाबत भारत आत्मनिर्भर होणे अतिशय आवश्यक आहे. लष्कराकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असण्याबरोबरच संरक्षणविषयक अन्य सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

‘लष्कराने दहशतवादाचा केला कठोर मुकाबला’- देशाच्या सीमांचे रक्षण व दहशतवादाचा मुकाबला लष्कराने समर्थपणे केला आहे असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत म्हणाले.- सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख मनोज पांडे, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांचीही भाषणे यावेळी झाली. 

सरकारशिवाय निधी उभारणारकेंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त आणखी निधी उभारण्याकरिता काय पर्याय अमलात आणता येतील याचा लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत विचार करण्यात आला. 

लष्करावर गाढ विश्वाससीमाभागात पायाभूत सुविधांचा होणारा विकास तसेच या भागात संरक्षणदृष्ट्या उचलण्यात आलेली पावले यांच्यात समन्वय साधला जाणार आहे.सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दर दोन वर्षांनी अशी बैठक आयोजिण्यात येते. यंदाची बैठक मंगळवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.देशातील ज्या यंत्रणांवर जनतेचा गाढ विश्वास आहे, त्यामध्ये लष्कराचा समावेश होतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या बैठकीत सांगितले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभाग