शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चीनशी युद्ध हा काही अंतिम पर्याय नव्हे - सुषमा स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 19:28 IST

डोकलाम मुद्द्यावर आज राज्यसभेत विरोधाकांनी गोंधळ घातल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे शेजारील देशांबरोबरच्या संबंधावर भाष्य केलं.

नवी दिल्ली, दि. 3 - डोकलाम मुद्द्यावर आज राज्यसभेत विरोधाकांनी गोंधळ घातल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे शेजारील देशांबरोबरच्या संबंधावर भाष्य केलं. यावेळी   चीनशी युद्ध हा काही अंतिम पर्याय नसल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भारत शेजारील राष्ट्रांसोबत संबंध वाढवत आहे. आर्थिक विकासासाठी चीनकडून मदत घेतली आहे. श्रीलंका, नेपाळ या देशांना भारताने अनेकदा मदत केली असे  निवेदन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले.  दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका आणि रशिया भारतासोबत उभे आहेत.  पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले पण दहशतवाद थांबवल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा अशक्य असल्याचे स्वराज यांनी राज्यसभेत सांगितले. पुढे बोलताना सुषमा स्वराज यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी आपला वयक्तिक सन्मान मिळवला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताला सन्मान मिळवून दिला. ज्यावेळी श्रीलंकेमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भारताने सर्वात आधी त्यांना मदत पुरवली. त्यानंतर नेपाळमध्ये भूकंप झाल्यांनंतरही भारताने मदत पोहचवली होती. यमन येथून आम्ही 4500 भारतीयांना सोडवले तसेच 2000 परदेशी नागरिकांनाही बाहेर काढले. हे आमच्या परराष्ट्र धोरणाचे यश असल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं.