शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 06:02 IST

या संकटाचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे. कोरोना काळात देशातील जनतेने जशी एकजूट दाखविली तशीच तयारी यावेळीही ठेवावी. कोरोनाप्रमाणेच या  संकटावरही मात करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. देशात पुरेसा इंधनसाठा असल्याचेही ते म्हणाले.

इराण युद्धाबाबत मोदी म्हणाले, पश्चिम आशियातील संकटावर चर्चा आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढावा असा भारताने कायम आग्रह धरला आहे. व्यापारी जहाजांवरील हल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे भारताला अमान्य आहेत. 

३ लाख ७५ हजार भारतीय मायदेशी सुखरूप परतले

मोदी म्हणाले, भारत २७ ऐवजी ४१ देशांकडून इंधन आयात करत आहे.  युद्ध सुरू झाल्यापासून ३ लाख ७५ हजारांहून अधिक भारतीय सुरक्षित मायदेशी परतले आहेत. त्यात ७००हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी आहेत.

पंतप्रधानांनी या मुद्द्यांकडे वेधले लक्ष

तेल आणि वायू : सध्या ६.५ दशलक्ष मेट्रिक टन साठा क्षमता निर्माण करण्याचे काम सुरू. भारत सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात.

अन्न आणि रेशन पुरवठा : अन्नधान्याचा पुरेसा साठा. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशा व्यवस्था. शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना.

वीज पुरवठा : देशातील वीज निर्मिती केंद्रांवर कोळशाचा साठा उपलब्ध. वीज निर्मितीपासून ते वितरणापर्यंत प्रणालीच्या प्रत्येक पैलूवर सातत्याने देखरेख.

ऊर्जा : ऊर्जा हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संघर्षाचा भारतावर होणारा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी धोरणात्मक पातळीवर काम. त्यासाठी एक विशेष गट स्थापन.

राजनैतिक संवाद : व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले किंवा त्यांना होणारा अडथळा पूर्णपणे अस्वीकार्य. शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत त्यांना प्रोत्साहित करत आहे.

या संकटाचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

 

English
हिंदी सारांश
Web Title : War creates crisis like Corona; Be alert: PM Modi

Web Summary : PM Modi warned the West Asia conflict could be prolonged, urging unity like during Covid. India has sufficient fuel reserves and is importing from 41 countries. Over 3.75 lakh Indians safely returned home. India advocates peaceful resolution, opposing attacks on ships. Security agencies are on alert.
टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडरCrude Oilखनिज तेलFuel Crisisइंधन टंचाई