शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 08:50 IST

शनिवारी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगालच्या डीजीपींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला.

नवी दिल्ली - वक्फ सुधारणा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यापासून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद इथं हिंसाचार भडकला आहे. केंद्र सरकारकडून देशातील इतर राज्यातही धार्मिक तणावाची शक्यता पाहता सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारला वक्फ सुधारणा अधिनियम २०२५ च्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कुठल्याही धार्मिक तणावाची रिपोर्ट मिळाला नाही असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 “हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना

मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाला कुठलीही जोखीम पत्करायची नाही. केंद्राने बंगालसह अन्य राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करडी नजर ठेवली आहे. ज्याठिकाणी वक्फ कायद्याविरोधात आंदोलन असेल, धार्मिक हिंसाचार वाढवणारी कृत्ये याचा आढावा घेतला जात आहे. आंदोलन जास्त भडकणार नाही याची काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारांना देण्यात आली आहे. त्याशिवाय राज्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाची मागणी केल्यास तात्काळ त्यांना ती सुविधा दिली जाईल जेणेकरून हिंसाचार भडकणार नाही अशीही व्यवस्था करण्यात आली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुर्शिदाबाद येथे पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांनी तणावग्रस्त भागाचा दौरा केला. कोर्टाच्या निर्देशानुसार पर्यायी केंद्रीय दल तिथे तैनात करण्यात आले आहे. धार्मिक तणाव रोखण्याचा सुरक्षा दलाचा प्रयत्न आहे. अद्याप कुठलीही नवीन हिंसेची घटना घडली नाही असं त्यांनी म्हटलं. शनिवारी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगालच्या डीजीपींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. तणावग्रस्त भागात नियंत्रण मिळवण्यासाठी काही पर्याय तयार ठेवले आहेत. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील तणाव सध्या नियंत्रणात आहे. स्थानिक पातळीवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची मदत घेतली जात आहे. धार्मिक हिंसाचार भडकवल्याप्रकरणी शनिवारपर्यंत १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मुर्शिदाबादमध्ये सध्या ३०० बीएएसएफ जवानांसोबतच राज्य सरकारच्या मागणीवरून केंद्रीय बलाच्या ५ अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालwaqf board amendment billवक्फ बोर्डCentral Governmentकेंद्र सरकार