शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही? ओवेसींच्या प्रश्नावर रिजिजूंचे त्याच भाषेत उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 00:13 IST

Waqf Amendment Bill: केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावर बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेच्या अखेरीस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाची आवश्यकता अधोरेखित करताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.

केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावर बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेच्या अखेरीस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाची आवश्यकता अधोरेखित करताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षामधील नेते या विधेयकाला असंवैधानिक, बेकायदेशीर म्हणत आहेत. मात्र त्यामध्ये नेमकं काय बेकायदेशीर आहे, हे मात्र सांगत नाही आहेत, असा टोला लगावला. तसेच वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही, असा प्रश्न विचारणाऱ्या ओवेसी यांनाही रिजिजू यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. 

रिजिजू म्हणाले की, अनेक वाद सुरू आहेत. मात्र आपण जे करू शकतो ते केलं पाहिले. आपल्याकडे नोंदी असल्या पाहिजेत तेव्हाच आपण काही पाऊल उचलू शकतो. ओवेसी साहेब खूप विद्वान आहेत. त्यांनी आरोप केलाय की, असा कायदा हिंदूंसाठी का तयार केला जात नाही. मात्र हिंदूंमध्ये अशी तरतूद आधीपासून आहे. इस्लाममध्ये महिला आणि मुलींसाठी आम्ही तरतूद करत आहोत. तेही आमच्या देशाचे नागरिक आहेत. आम्ही त्यांना सोडणार नाही. रिजिजू पुढे म्हणाले की, आता येथील चर्चेदरम्यान, म्हटलं गेलं की, जिल्हाधिकारी हे असं पद आहे जे केवळ नुकसान करण्यासाठीच तयार केलं गेलेलं आहे.  पण त्यावर विश्वास ठेवता कामा नये, जिल्हाधिकाऱ्यांचं मूळ काम हे महसूल आणि प्रशासन हे असतं. ते जिल्ह्याचे कल्याणकारी अधिकारी असतात. जर तुमचा त्यांच्यावरच विश्ववास नसेल तर तुम्ही कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही. जिल्हाधिकारी तर कुठल्याही पक्षाचे नसतात, असा टोलाही रिजिजू यांनी लगावला.    वक्फ संशोधन विधेयकावर झालेल्या चर्चेच्या अखेरीस किरेन रिजिजू म्हणाले की, विरोधी पक्षांमधील नेते हे वक्फ संशोधन विधेयकाला बेकायदेशीर म्हणत आहेत. मात्र त्यात नेमकं काय बेकायदेशीर आहे. हे मात्र त्यांना सांगता येत नाही आहे. त्यामुळे ते माझं म्हणणं समजून घेतील ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणं सोडून दिलं आहे. सभागृहामध्ये अनेक अतार्किक गोष्टीही बोलल्या गेल्या. असेही ते म्हणाले.  

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डCentral Governmentकेंद्र सरकारAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी