शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही? ओवेसींच्या प्रश्नावर रिजिजूंचे त्याच भाषेत उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 00:13 IST

Waqf Amendment Bill: केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावर बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेच्या अखेरीस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाची आवश्यकता अधोरेखित करताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.

केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावर बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेच्या अखेरीस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाची आवश्यकता अधोरेखित करताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षामधील नेते या विधेयकाला असंवैधानिक, बेकायदेशीर म्हणत आहेत. मात्र त्यामध्ये नेमकं काय बेकायदेशीर आहे, हे मात्र सांगत नाही आहेत, असा टोला लगावला. तसेच वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही, असा प्रश्न विचारणाऱ्या ओवेसी यांनाही रिजिजू यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. 

रिजिजू म्हणाले की, अनेक वाद सुरू आहेत. मात्र आपण जे करू शकतो ते केलं पाहिले. आपल्याकडे नोंदी असल्या पाहिजेत तेव्हाच आपण काही पाऊल उचलू शकतो. ओवेसी साहेब खूप विद्वान आहेत. त्यांनी आरोप केलाय की, असा कायदा हिंदूंसाठी का तयार केला जात नाही. मात्र हिंदूंमध्ये अशी तरतूद आधीपासून आहे. इस्लाममध्ये महिला आणि मुलींसाठी आम्ही तरतूद करत आहोत. तेही आमच्या देशाचे नागरिक आहेत. आम्ही त्यांना सोडणार नाही. रिजिजू पुढे म्हणाले की, आता येथील चर्चेदरम्यान, म्हटलं गेलं की, जिल्हाधिकारी हे असं पद आहे जे केवळ नुकसान करण्यासाठीच तयार केलं गेलेलं आहे.  पण त्यावर विश्वास ठेवता कामा नये, जिल्हाधिकाऱ्यांचं मूळ काम हे महसूल आणि प्रशासन हे असतं. ते जिल्ह्याचे कल्याणकारी अधिकारी असतात. जर तुमचा त्यांच्यावरच विश्ववास नसेल तर तुम्ही कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही. जिल्हाधिकारी तर कुठल्याही पक्षाचे नसतात, असा टोलाही रिजिजू यांनी लगावला.    वक्फ संशोधन विधेयकावर झालेल्या चर्चेच्या अखेरीस किरेन रिजिजू म्हणाले की, विरोधी पक्षांमधील नेते हे वक्फ संशोधन विधेयकाला बेकायदेशीर म्हणत आहेत. मात्र त्यात नेमकं काय बेकायदेशीर आहे. हे मात्र त्यांना सांगता येत नाही आहे. त्यामुळे ते माझं म्हणणं समजून घेतील ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणं सोडून दिलं आहे. सभागृहामध्ये अनेक अतार्किक गोष्टीही बोलल्या गेल्या. असेही ते म्हणाले.  

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डCentral Governmentकेंद्र सरकारAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी