शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही? ओवेसींच्या प्रश्नावर रिजिजूंचे त्याच भाषेत उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 00:13 IST

Waqf Amendment Bill: केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावर बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेच्या अखेरीस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाची आवश्यकता अधोरेखित करताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.

केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावर बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेच्या अखेरीस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाची आवश्यकता अधोरेखित करताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षामधील नेते या विधेयकाला असंवैधानिक, बेकायदेशीर म्हणत आहेत. मात्र त्यामध्ये नेमकं काय बेकायदेशीर आहे, हे मात्र सांगत नाही आहेत, असा टोला लगावला. तसेच वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही, असा प्रश्न विचारणाऱ्या ओवेसी यांनाही रिजिजू यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. 

रिजिजू म्हणाले की, अनेक वाद सुरू आहेत. मात्र आपण जे करू शकतो ते केलं पाहिले. आपल्याकडे नोंदी असल्या पाहिजेत तेव्हाच आपण काही पाऊल उचलू शकतो. ओवेसी साहेब खूप विद्वान आहेत. त्यांनी आरोप केलाय की, असा कायदा हिंदूंसाठी का तयार केला जात नाही. मात्र हिंदूंमध्ये अशी तरतूद आधीपासून आहे. इस्लाममध्ये महिला आणि मुलींसाठी आम्ही तरतूद करत आहोत. तेही आमच्या देशाचे नागरिक आहेत. आम्ही त्यांना सोडणार नाही. रिजिजू पुढे म्हणाले की, आता येथील चर्चेदरम्यान, म्हटलं गेलं की, जिल्हाधिकारी हे असं पद आहे जे केवळ नुकसान करण्यासाठीच तयार केलं गेलेलं आहे.  पण त्यावर विश्वास ठेवता कामा नये, जिल्हाधिकाऱ्यांचं मूळ काम हे महसूल आणि प्रशासन हे असतं. ते जिल्ह्याचे कल्याणकारी अधिकारी असतात. जर तुमचा त्यांच्यावरच विश्ववास नसेल तर तुम्ही कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही. जिल्हाधिकारी तर कुठल्याही पक्षाचे नसतात, असा टोलाही रिजिजू यांनी लगावला.    वक्फ संशोधन विधेयकावर झालेल्या चर्चेच्या अखेरीस किरेन रिजिजू म्हणाले की, विरोधी पक्षांमधील नेते हे वक्फ संशोधन विधेयकाला बेकायदेशीर म्हणत आहेत. मात्र त्यात नेमकं काय बेकायदेशीर आहे. हे मात्र त्यांना सांगता येत नाही आहे. त्यामुळे ते माझं म्हणणं समजून घेतील ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणं सोडून दिलं आहे. सभागृहामध्ये अनेक अतार्किक गोष्टीही बोलल्या गेल्या. असेही ते म्हणाले.  

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डCentral Governmentकेंद्र सरकारAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी