शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"पंतप्रधान व्हायचंय, म्हणूनच...", ममता बॅनर्जींच्या आरोपावर भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 20:16 IST

भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत म्हटलं की, ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान व्हायचं आहे, म्हणूनच त्या असं नाटक करत आहेत.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत आज नीती आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक झाली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हजेरी लावली. मात्र, ममता बॅनर्जी या नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

माझा माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला. यावर भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत म्हटलं की, ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान व्हायचं आहे, म्हणूनच त्या असं नाटक करत आहेत.

भाजप नेत्या लॉकेट चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेत. पीआयबी फॅक्ट चेकनं याची पुष्टी केली आहे. त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे, एक मोठ्या नेत्या बनायचं आहे. त्यामुळं त्या नाटक करत आहेत. टीएमसीचं राजकारण नाटकानं भरलेलं आहे. ममता दीदींना पश्चिम बंगालचं काही भले करण्याची इच्छा नाही, म्हणूनच त्या बैठकीपूर्वी निघून आल्या."

दुसरीकडे, भाजप नेत्या व केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनीही ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, "नीती आयोगाच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. आम्ही सर्वांनी त्या काय बोलतात ऐकलं. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना प्रत्येक टेबलवर बसवलेल्या स्क्रीनवर दिसणारा वेळ देण्यात आला होता. त्यांचा माईक बंद झाल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. हे पूर्णपणे खोटं आहे. सर्व मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. असं असतानाही ममता बॅनर्जींचा दावा दुर्दैवी आहे. त्यांनी खोट्या गोष्टींवर नॅरेटीव्ह तयार करण्याऐवजी खरं बोलावं".

ममता बॅनर्जींच्या आरोपांबाबत पीआयबीचा दावादरम्यान, ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांबाबत दुसरी बाजू समोर आणत पीआयबीनेही दावा केला आहे. सोशल मीडिया साईट एक्सवर पीआयबी फॅक्ट चेकने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात लिहिलं आहे की, नीती आयोगाच्या  बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माईक बंद करण्यात आल्याचा करण्यात आलेला आरोप चुकीचा आहे. 

बैठक अर्धवट सोडून आल्यावर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर ममता बॅनर्जी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, 'केंद्र सरकारनं राज्य सरकारांशी भेदभाव करू नये. मला बोलायचं होतं, पण मला फक्त ५ मिनिटं बोलू दिलं. माझ्या आधीचे लोक १० ते २० मिनिटं बोलले. या बैठकीत विरोधी पक्षातील मी एकटीच होते, पण तरीही मला बोलू दिलं गेलं नाही. हे अपमानास्पद आहे." पुढे त्या म्हणाल्या, "मी बोलत होते, तेवढ्यात माझा माईक बंद करण्यात आला. मी म्हणाले, तुम्ही मला का थांबवलं, तुम्ही भेदभाव का करताय? मी बैठकीत सहभागी होत आहे, तुम्ही खुश व्हायला पाहिजे, त्याऐवजी तुम्ही तुमची पार्टी, तुमच्या सरकारला अधिक वाव देत आहात आणि तुम्ही मला बोलण्यापासून रोखत आहात, हा केवळ बंगालचाच नाही तर सर्व प्रादेशिक पक्षांचाही अपमान आहे." दरम्यान, केंद्र सरकारनं म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांचा माईक बंद झाला नव्हता, त्यांची बोलण्याची वेळ संपली होती. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNIti Ayogनिती आयोगNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBJPभाजपा