शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संसद चालावी ही इच्छा, सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको असल्याचा आरोप : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:37 IST

अदानीशी निगडित मुद्यावरील लक्ष्य हटविण्यासाठी जॉर्ज सोरोस सोबतच्या संबंधाचा मुद्दा उकरून काढला आहे. केंद्र सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको आहे. त्यामुळे ते चर्चा दुरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही हा मुद्दा मांडत राहू असा दावा गांधींनी केला. 

नवी दिल्ली : संसदेचे कामकाज चालावे ही आमची इच्छा आहे. मात्र, केंद्र सरकारची अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची इच्छा नसल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकावे यासाठी गांधींनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओब बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गांधींनी सरकारवर टीका केली.

सभागृहात कामकाज चालावे हा आमचा उद्देश असून संसेदत चर्चा व्हायला हवी. सत्ताधाऱ्यांना माझ्याबद्दल जे काही बोलायचे आहे, ते त्यांनी बोलावे. मात्र, संसदेचे कामकाज सुरळीत चालायला हवे. १३ व १४ डिसेंबर रोजी लोकसभेत संविधानावर चर्चा करण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे ही चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले. अदानीशी निगडित मुद्यावरील लक्ष्य हटविण्यासाठी जॉर्ज सोरोस सोबतच्या संबंधाचा मुद्दा उकरून काढला आहे. केंद्र सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको आहे. त्यामुळे ते चर्चा दुरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही हा मुद्दा मांडत राहू असा दावा गांधींनी केला. 

सोरोस मुद्द्यावरून सदन स्थगित लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसने सोरोस प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थिती लपवण्यासाठी जॉर्ज सोरोस प्रकरणाचा ढाली प्रमाणे वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.नंतर सत्ताधाऱ्यांनी सोरोससोबत संगनमत करून काँग्रेस देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. नंतर गोंधळामुळे कामकाज दीड तास स्थगित झाले.

अणुऊर्जा क्षमता तिप्पट होईलnभारतीची अणुऊर्जा क्षमता गत दशकात दुप्पट झाली असून ती २०३१ पर्यंत तिप्पट होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.nगत दोन दशकात अणुऊर्जा क्षमता ४,७८० मेगावॅटवरून ८,०८१ मेगावॅट झाली आहे. मात्र, त्यात वाढ होऊन ती २०३१-३२ मध्ये २२,४८० मेगावॉट होईल, अशी अपेक्षा असल्याचे सिंह यांनी सांगितले. 

...तरच एआय कायदा शक्यसंसद व समाजाची परवानगी असेल तरच केंद्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर करण्यासंदर्भात कायदा करण्यास तयार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले. काँग्रेस खासदार अदूर प्रकाश यांच्या पूरक प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव बोलत होते.

तिरंगा व गुलाब देत विरोधकांची निदर्शनेnअदानी समूहाशी निगडित मुद्यावर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी बुधवारी अनोख्या पद्धतीने संसद परिसरात निदर्शने केली.nदरम्यान विरोधकांनी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना तिरंगा व गुलाबाची फुले भेट देत आंदोलन केले. संसद भवनाच्या मकरद्वारजवळ एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या हातात तिरंगा झेंडा व गुलाबाचे फुले होती.nकाँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व इंडिया आघाडीतील काही घटक पक्ष या निदर्शनात सहभागी झाले होते. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीदेखील या निदर्शनात सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी