शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

मैत्री हवी; पण दहशतवाद रोखा

By admin | Updated: May 28, 2014 03:30 IST

भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी औपचारिक पदभार स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली़

नवी दिल्ली : भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी औपचारिक पदभार स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली़ आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध हवेत; पण यासाठी पाकने आपल्या भूमीवरून होणार्‍या अतिरेकी कारवाया थांबवाव्यात, असे मोदींनी शरीफ यांना सुनावले़ हैदराबाद हाऊस येथील सुमारे ५० मिनिटांच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान मोदींनी शरीफ यांच्यासमक्ष दहशतवाद, मुंबई हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करीत उभय देशातील संबंध दृढ करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली़ परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यावेळी उपस्थित होत्या़ द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याच्या दिशेने परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चा सुरू राहील, यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली़ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी सांगितले की, शरीफ यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला़ पाक भूमीवरून भारतात होणार्‍या अतिरेकी कारवायांवर अंकूश ठेवण्याची प्रतिबद्धता पाकिस्तानने निभवावी, असे मोदींनी शरीफ यांना सांगितले़ २६/११ च्या मुंबई हल्ल्यासंदर्भात अतिशय संथ सुरू असलेल्या पाकिस्तानातील न्यायालयीन प्रक्रियेवर मोदींनी विशेष चिंता व्यक्त केली़ याशिवाय परस्पर व्यापार संधींवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली़ मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारण्यास पाकमधील कट्टरवादी तत्त्वांनी नाराजी व्यक्त केली होती़ ही नाराजी अव्हेरून शरीफ भारतात आले व मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यात सामील झाले़ या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे़ मोदींसोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ शांती व सुरक्षेसाठी उभय देशांना आरोप-प्रत्यारोपाऐवजी संवाद वाढविण्याची गरज आहे़ भारताच्या नवनियुक्त पंतप्रधानांसोबतची आजची चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली़ आजच्या भेटीतील हेच सौहार्द कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव लवकरच भेटतील़ उभय देशात विविध मुद्यांवरील चर्चा निरंतर व सकारात्मकरीत्या पुढे चालावी, यासाठीचे हे प्रयत्न असल्याचे शरीफ यावेळी म्हणाले़