शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

मैत्री हवी; पण दहशतवाद रोखा

By admin | Updated: May 28, 2014 03:30 IST

भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी औपचारिक पदभार स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली़

नवी दिल्ली : भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी औपचारिक पदभार स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली़ आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध हवेत; पण यासाठी पाकने आपल्या भूमीवरून होणार्‍या अतिरेकी कारवाया थांबवाव्यात, असे मोदींनी शरीफ यांना सुनावले़ हैदराबाद हाऊस येथील सुमारे ५० मिनिटांच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान मोदींनी शरीफ यांच्यासमक्ष दहशतवाद, मुंबई हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करीत उभय देशातील संबंध दृढ करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली़ परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यावेळी उपस्थित होत्या़ द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याच्या दिशेने परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चा सुरू राहील, यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली़ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी सांगितले की, शरीफ यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला़ पाक भूमीवरून भारतात होणार्‍या अतिरेकी कारवायांवर अंकूश ठेवण्याची प्रतिबद्धता पाकिस्तानने निभवावी, असे मोदींनी शरीफ यांना सांगितले़ २६/११ च्या मुंबई हल्ल्यासंदर्भात अतिशय संथ सुरू असलेल्या पाकिस्तानातील न्यायालयीन प्रक्रियेवर मोदींनी विशेष चिंता व्यक्त केली़ याशिवाय परस्पर व्यापार संधींवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली़ मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारण्यास पाकमधील कट्टरवादी तत्त्वांनी नाराजी व्यक्त केली होती़ ही नाराजी अव्हेरून शरीफ भारतात आले व मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यात सामील झाले़ या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे़ मोदींसोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ शांती व सुरक्षेसाठी उभय देशांना आरोप-प्रत्यारोपाऐवजी संवाद वाढविण्याची गरज आहे़ भारताच्या नवनियुक्त पंतप्रधानांसोबतची आजची चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली़ आजच्या भेटीतील हेच सौहार्द कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव लवकरच भेटतील़ उभय देशात विविध मुद्यांवरील चर्चा निरंतर व सकारात्मकरीत्या पुढे चालावी, यासाठीचे हे प्रयत्न असल्याचे शरीफ यावेळी म्हणाले़